शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: अयोध्येच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 03:32 IST

रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अयोध्या : रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेली अनेक दशके अयोध्येत सुरू असलेल्या या वादामुळे तेथील नागरिकांना जातीय तणाव, हिंसाचार अशा घटनांचा वेळोवेळी सामना करावा लागला होता. अयोध्येतील वादग्रस्त भूमी राममंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाने देऊ केल्याने आता हा सारा वादच संपुष्टात आला आहे.या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. निकालाच्या आधी किंवा नंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या शहराच्या गल्लीबोळात पोलिसांनी बॅरिकेड उभारली होती. निकालानंतर अयोध्येतील काही ठिकाणी हल्ले होतील या भीतीने तेथील नागरिकांनी आपल्या घरातील महिला, मुले यांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. नेमका काय निकाल लागेल व त्यानंतर काय होईल याविषयी अयोध्येतील रहिवाशांच्या मनात अनेक शंका होत्या. त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करत होते, त्यावेळेस अयोध्येतील रिकबगंज भागातील रहिवासी प्रीती सिंह या आपल्या मुलासमवेत दूर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. निकालाचा तपशील ऐकून त्यांनी देवाचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत हनुमानगढी भागात काही युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. शिंपीकाम करणाऱ्या मोहम्मद सईद यांनी सांगितले की, न्यायालयाचा निकाल अपूर्ण आहे. मात्र त्यासंदर्भात त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांनी शनिवारी निकालाबाबत आनंद व्यक्त केला. त्यातील भारत सिंह यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर लगेचच अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी ११.३० वाजता रामलल्लाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमीचा वाद सुटल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले असेही ते म्हणाले.>पुजाºयाकडून न्यायालयाचे अभिनंदनहनुमानगढी मंदिरातील पुजारी महंत राजूदास म्हणाले की, गेल्या पाचशे वर्षांपासून चिघळलेला वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सुटला आहे. न्यायालयाने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशांचे मी अभिनंदन करतो. लखनऊ येथील काही नागरिक मात्र वेगळ््या प्रकारे व्यक्त झाले. तेथील एक चहाविक्रेता राजू म्हणाला की, आम्हाला शांतता हवी आहे. त्यामुळे माझा उद्योगधंदा नीटपणे करता येईल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर