शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Ayodhya Verdict: अयोध्येच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 03:32 IST

रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अयोध्या : रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेली अनेक दशके अयोध्येत सुरू असलेल्या या वादामुळे तेथील नागरिकांना जातीय तणाव, हिंसाचार अशा घटनांचा वेळोवेळी सामना करावा लागला होता. अयोध्येतील वादग्रस्त भूमी राममंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाने देऊ केल्याने आता हा सारा वादच संपुष्टात आला आहे.या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. निकालाच्या आधी किंवा नंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या शहराच्या गल्लीबोळात पोलिसांनी बॅरिकेड उभारली होती. निकालानंतर अयोध्येतील काही ठिकाणी हल्ले होतील या भीतीने तेथील नागरिकांनी आपल्या घरातील महिला, मुले यांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. नेमका काय निकाल लागेल व त्यानंतर काय होईल याविषयी अयोध्येतील रहिवाशांच्या मनात अनेक शंका होत्या. त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करत होते, त्यावेळेस अयोध्येतील रिकबगंज भागातील रहिवासी प्रीती सिंह या आपल्या मुलासमवेत दूर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. निकालाचा तपशील ऐकून त्यांनी देवाचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत हनुमानगढी भागात काही युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. शिंपीकाम करणाऱ्या मोहम्मद सईद यांनी सांगितले की, न्यायालयाचा निकाल अपूर्ण आहे. मात्र त्यासंदर्भात त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांनी शनिवारी निकालाबाबत आनंद व्यक्त केला. त्यातील भारत सिंह यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर लगेचच अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी ११.३० वाजता रामलल्लाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमीचा वाद सुटल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले असेही ते म्हणाले.>पुजाºयाकडून न्यायालयाचे अभिनंदनहनुमानगढी मंदिरातील पुजारी महंत राजूदास म्हणाले की, गेल्या पाचशे वर्षांपासून चिघळलेला वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सुटला आहे. न्यायालयाने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशांचे मी अभिनंदन करतो. लखनऊ येथील काही नागरिक मात्र वेगळ््या प्रकारे व्यक्त झाले. तेथील एक चहाविक्रेता राजू म्हणाला की, आम्हाला शांतता हवी आहे. त्यामुळे माझा उद्योगधंदा नीटपणे करता येईल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर