शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

By admin | Updated: May 19, 2016 04:24 IST

जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत,

अनिलसिंग ठाकूर- बैतुल- मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांची तर अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी बनावट असल्याच्या आरोपांवरून वाद उफाळला असताना, आलोक सागर यांचे नाव वेगळ्या कारणाने समोर आले आहे.देश आणि जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत, हे बैतुलच्या आदिवासी भागात तुम्ही गेलात आणि त्यांच्याकडे बघितले, तर विश्वासच बसणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजनसुद्धा त्या काळी दिल्ली विद्यापीठात शिकत होते. आलोक सागर गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मध्य प्रदेशच्या घोडाडोंगरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शाहपूर ब्लॉकमधील कोचामाऊ गावी एका आदिवासीप्रमाणे जीवन जगत आहेत.तेथील गावकरी आणि परिसरातील लोक त्यांना सेवाभावी कार्यकर्ते म्हणून ओळखतात. आदिवासींपैकी कुणालाही त्यांच्या वास्तविक शैक्षणिक गुणवत्तेची माहिती नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या या पदव्या एका झोळीत पडून आहेत. मात्र, अलीकडे कारणच तसे घडले की, त्यांच्या या उच्च पदव्यांना जगासमोर यावे लागले.आलोक सागर यांचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, तर आई दिल्ली मिरांडा हाउस येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. आलोक यांनी १९७३ मध्ये आयआयटी दिल्ली येथून एमटेक केल्यानंतर 1977मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टन विद्यापीठातून पीएच.डी मिळविली. याच विद्यापीठात पदव्युत्तर डॉक्टरेट मिळवून कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठात समाजशास्त्र विभागात फेलोशिप पूर्ण केली. भारतात परतल्यानंतर ते दिल्ली आयआयटी येथे प्रोफेसर म्हणून रूजू झाले. काही काळानंतर नोकरी सोडून ते समाजसेवेकडे वळले. आदिवासींसाठी काही करण्याची इच्छा बाळगत ते १९९० च्या काळात बैतुलजवळील कोचामाऊ येथे पोहोचले. नव्या आयुष्याची सुरुवात झाली. हळूहळू ते आदिवासींमध्ये मिसळले. आदिवासींनी जवळ यावे, यासाठी त्यांनी उच्चशिक्षित असल्याची ओळख दडवून ठेवली. त्यांनी आदिवासींचे आयुष्य बदलण्यास स्वत: खडतर जीवनाचा मार्ग अवलंबला. आतापर्यंत त्यांनी ५० हजारांवर फळझाडे लावली आहेत. त्याचा लाभ गावकरी, आदिवासींना मिळतो. ते झोपडीत राहतात. विहिरीतून पाणी काढून ते स्वत: झाडांना देतात. राहायला झोपडी, फिरायला सायकल... ते एका झोपडीत राहतात. सायकलवरून या भागात फिरतात. मुलांना शिकवितात. ते बहुभाषी असून आदिवासींची भाषाही शिकले आहेत. ‘मी माझे शिक्षण आणि पदवींबद्दल आदिवासींना सांगितले असते, तर त्यांनी माझ्यापासून अंतर राखले असते,’ असे ते सांगतात. स्वत: हाताने दळण दळतात. आलोक यांचे छोटे बंधू अंबुज सागर आयआयटी दिल्लीला प्रोफेसर असून, त्यांच्या एक भगिनी कॅनडामध्ये तर दुसऱ्या भगिनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सेवेत होत्या.>अचानक आले प्रकाशझोतात... सध्या घोडाडोंगरी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, ३० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे बाहेरील लोकांना हाकलण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे. पोलिसांची वक्रदृष्टी आलोक सागर यांच्यावर पडली आणि लगेच फर्मान धाडले गेले. हा भाग सोडला नाही, तर कारागृहात डांबण्याची धमकी एका पोलिसाने दिली. आलोक सागर हे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पदव्यांची माहिती देताच पोलिसांवर हैराण होण्याची पाळी आली.