शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एके काळचा आयआयटी प्रोफेसर देतोय आदिवासींना आयुष्याचे धडे

By admin | Updated: May 19, 2016 04:24 IST

जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत,

अनिलसिंग ठाकूर- बैतुल- मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांची तर अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी बनावट असल्याच्या आरोपांवरून वाद उफाळला असताना, आलोक सागर यांचे नाव वेगळ्या कारणाने समोर आले आहे.देश आणि जगभरातील महत्त्वपूर्ण उच्च पदव्या झोळीत असलेले आलोक सागर कधी काळी आयआयटी दिल्ली येथे प्रोफेसर राहिले आहेत, हे बैतुलच्या आदिवासी भागात तुम्ही गेलात आणि त्यांच्याकडे बघितले, तर विश्वासच बसणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजनसुद्धा त्या काळी दिल्ली विद्यापीठात शिकत होते. आलोक सागर गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मध्य प्रदेशच्या घोडाडोंगरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शाहपूर ब्लॉकमधील कोचामाऊ गावी एका आदिवासीप्रमाणे जीवन जगत आहेत.तेथील गावकरी आणि परिसरातील लोक त्यांना सेवाभावी कार्यकर्ते म्हणून ओळखतात. आदिवासींपैकी कुणालाही त्यांच्या वास्तविक शैक्षणिक गुणवत्तेची माहिती नाही. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या या पदव्या एका झोळीत पडून आहेत. मात्र, अलीकडे कारणच तसे घडले की, त्यांच्या या उच्च पदव्यांना जगासमोर यावे लागले.आलोक सागर यांचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, तर आई दिल्ली मिरांडा हाउस येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. आलोक यांनी १९७३ मध्ये आयआयटी दिल्ली येथून एमटेक केल्यानंतर 1977मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टन विद्यापीठातून पीएच.डी मिळविली. याच विद्यापीठात पदव्युत्तर डॉक्टरेट मिळवून कॅनडाच्या डलहौसी विद्यापीठात समाजशास्त्र विभागात फेलोशिप पूर्ण केली. भारतात परतल्यानंतर ते दिल्ली आयआयटी येथे प्रोफेसर म्हणून रूजू झाले. काही काळानंतर नोकरी सोडून ते समाजसेवेकडे वळले. आदिवासींसाठी काही करण्याची इच्छा बाळगत ते १९९० च्या काळात बैतुलजवळील कोचामाऊ येथे पोहोचले. नव्या आयुष्याची सुरुवात झाली. हळूहळू ते आदिवासींमध्ये मिसळले. आदिवासींनी जवळ यावे, यासाठी त्यांनी उच्चशिक्षित असल्याची ओळख दडवून ठेवली. त्यांनी आदिवासींचे आयुष्य बदलण्यास स्वत: खडतर जीवनाचा मार्ग अवलंबला. आतापर्यंत त्यांनी ५० हजारांवर फळझाडे लावली आहेत. त्याचा लाभ गावकरी, आदिवासींना मिळतो. ते झोपडीत राहतात. विहिरीतून पाणी काढून ते स्वत: झाडांना देतात. राहायला झोपडी, फिरायला सायकल... ते एका झोपडीत राहतात. सायकलवरून या भागात फिरतात. मुलांना शिकवितात. ते बहुभाषी असून आदिवासींची भाषाही शिकले आहेत. ‘मी माझे शिक्षण आणि पदवींबद्दल आदिवासींना सांगितले असते, तर त्यांनी माझ्यापासून अंतर राखले असते,’ असे ते सांगतात. स्वत: हाताने दळण दळतात. आलोक यांचे छोटे बंधू अंबुज सागर आयआयटी दिल्लीला प्रोफेसर असून, त्यांच्या एक भगिनी कॅनडामध्ये तर दुसऱ्या भगिनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सेवेत होत्या.>अचानक आले प्रकाशझोतात... सध्या घोडाडोंगरी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, ३० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे बाहेरील लोकांना हाकलण्यासाठी पोलिसांनी मोहीम छेडली आहे. पोलिसांची वक्रदृष्टी आलोक सागर यांच्यावर पडली आणि लगेच फर्मान धाडले गेले. हा भाग सोडला नाही, तर कारागृहात डांबण्याची धमकी एका पोलिसाने दिली. आलोक सागर हे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पदव्यांची माहिती देताच पोलिसांवर हैराण होण्याची पाळी आली.