शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

‘पुरस्कार वापसी’ अन् असहिष्णुतेचे कवित्व सुरूच

By admin | Updated: November 1, 2015 00:30 IST

विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच

नवी दिल्ली : विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच भारत समृद्ध झाला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठवड्यात अनेकदा वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध चिंता व्यक्त करणारे राष्ट्रपती येथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण जयंती समारंभात बोलत होते. आमच्या प्राचीन सभ्यतांनी गेल्या अनेक शतकांपासून या विविधतेचे जतन केले आहे. याकडे लक्ष वेधताना मुखर्जी म्हणाले की, बहुविधता ही आमची सामूहिक शक्ती असून, राज्यघटनेच्या विविध तरतुदींमधूनही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. याप्रसंगी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. काही बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय स्तरावर अत्यधिक अचूकता किंवा सतर्कता बाळगल्याने प्रगतीचा मार्ग खुंटतो. प्रगतीसाठी परस्पर आदर आणि सहिष्णुता याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ते येथे आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभात बोलत होते. ते म्हणाले की, एखाद्याच्या विचाराने बौद्धिक समूहाला इजा होत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे काय, असे विचारले असता ते म्हणाले की, लगेचच बंदी घातल्यास चर्चा बंद होते. त्यामुळे एक मार्ग बंद होतो. त्वरित बंदीस माझा विरोध आहे.साहित्यिकांचे निषेधसत्र थांबेना; साहित्य अकादमी पेचातदेशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरू केल्याने साहित्य अकादमी चांगलीच पेचात आली आहे.आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी आपले सन्मानचिन्ह आणि पुरस्काराची रोख रक्कम साहित्य अकादमीला परत पाठविली आहे; पण साहित्य अकादमीने अद्यापपर्यंत पुरस्कारांची रक्कम स्वीकारलेली नाही.तेलुगू साहित्यिक एम. भूपल रेड्डी यांचा २०११ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेले ५० हजार रुपये रोख बँकेतच ठेवले होते. ते पैसे काढून घेतले नाहीत. त्यांनी अलीकडेच पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्याच रकमेचा धनादेश व मानचिन्ह त्यांनी साहित्य अकादमीला परत पाठविले. त्यांनी धनादेश पाठवून १५ दिवस उलटून गेले; पण त्यांच्या खात्यातील रक्कम जशीच्या तशीच आहे. साहित्य अकादमीने त्या पैशाला हात लावलेला नाही. भूपल रेड्डी यांच्याप्रमाणेच देशाच्या अनेक भागांतून साहित्य अकादमीला दररोज पार्सल येत आहेत; पण अकादमीने त्यांना हात लावलेला नाही. ते पार्सल तसेच पडून आहेत.याबाबत साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव म्हणाले की, साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पाठविले असले तरीही आम्ही ते स्वीकारत नाही. ते फक्त आमच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. आम्ही धनादेशांनाही हात लावलेला नाही. साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळच याबाबत निर्णय घेईल.