शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

‘पुरस्कार वापसी’ अन् असहिष्णुतेचे कवित्व सुरूच

By admin | Updated: November 1, 2015 00:30 IST

विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच

नवी दिल्ली : विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य असून, त्याची जपणूक करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेच्या बळावरच भारत समृद्ध झाला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठवड्यात अनेकदा वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध चिंता व्यक्त करणारे राष्ट्रपती येथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण जयंती समारंभात बोलत होते. आमच्या प्राचीन सभ्यतांनी गेल्या अनेक शतकांपासून या विविधतेचे जतन केले आहे. याकडे लक्ष वेधताना मुखर्जी म्हणाले की, बहुविधता ही आमची सामूहिक शक्ती असून, राज्यघटनेच्या विविध तरतुदींमधूनही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. याप्रसंगी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. काही बाबींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय स्तरावर अत्यधिक अचूकता किंवा सतर्कता बाळगल्याने प्रगतीचा मार्ग खुंटतो. प्रगतीसाठी परस्पर आदर आणि सहिष्णुता याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ते येथे आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभात बोलत होते. ते म्हणाले की, एखाद्याच्या विचाराने बौद्धिक समूहाला इजा होत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे काय, असे विचारले असता ते म्हणाले की, लगेचच बंदी घातल्यास चर्चा बंद होते. त्यामुळे एक मार्ग बंद होतो. त्वरित बंदीस माझा विरोध आहे.साहित्यिकांचे निषेधसत्र थांबेना; साहित्य अकादमी पेचातदेशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी विविध साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरू केल्याने साहित्य अकादमी चांगलीच पेचात आली आहे.आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी आपले सन्मानचिन्ह आणि पुरस्काराची रोख रक्कम साहित्य अकादमीला परत पाठविली आहे; पण साहित्य अकादमीने अद्यापपर्यंत पुरस्कारांची रक्कम स्वीकारलेली नाही.तेलुगू साहित्यिक एम. भूपल रेड्डी यांचा २०११ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेले ५० हजार रुपये रोख बँकेतच ठेवले होते. ते पैसे काढून घेतले नाहीत. त्यांनी अलीकडेच पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्याच रकमेचा धनादेश व मानचिन्ह त्यांनी साहित्य अकादमीला परत पाठविले. त्यांनी धनादेश पाठवून १५ दिवस उलटून गेले; पण त्यांच्या खात्यातील रक्कम जशीच्या तशीच आहे. साहित्य अकादमीने त्या पैशाला हात लावलेला नाही. भूपल रेड्डी यांच्याप्रमाणेच देशाच्या अनेक भागांतून साहित्य अकादमीला दररोज पार्सल येत आहेत; पण अकादमीने त्यांना हात लावलेला नाही. ते पार्सल तसेच पडून आहेत.याबाबत साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव म्हणाले की, साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार पाठविले असले तरीही आम्ही ते स्वीकारत नाही. ते फक्त आमच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. आम्ही धनादेशांनाही हात लावलेला नाही. साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळच याबाबत निर्णय घेईल.