शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नफ्याचा मोह टाळा, अॅप्रेन्टिस नेमा - मोदींचे उद्योगांना आवाहन

By admin | Updated: July 20, 2015 12:51 IST

उद्योजकांनी शिकाऊ उमेदवारांना (अॅप्रेन्टिस) मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यायला हवं, भलेही त्यांचा नफा थोडा घटला तरी चालेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - भारतीय उद्योजकांनी शिकाऊ उमेदवारांना (अॅप्रेन्टिस) मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यायला हवं, भलेही त्यांचा नफा थोडा घटला तरी चालेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चीन व जपानमध्ये अॅप्रेन्टिसची संख्या कोटींमध्ये आहे, जर्मनीसारख्या देशात ३० लाख अॅप्रेन्टिस आहेत, परंतु भारतासारख्या सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशात केवळ ३ लाख अॅप्रेन्टिस असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलायला हवी असे मोदी म्हणाले. दिल्लीत श्रमसंमेलनात बोलताना तरुणांना रोजगार हे मुख्य लक्ष्य असायला हवं आणि ही सुरुवात कुणीतरी करायला हवी असं सांगत उद्योगांनी सामाजिक जाणिवेच्या दृष्टीकोनातून अॅप्रेन्टिस नेमण्याला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
 
- १९६ कोटी रुपयांची तरतूद एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या आधुनिकीकरणासाठी करण्यात आली आहे.
- कामगारसंघटनांनीही कामगारांच्या हिताचा विचार करून सरकारला सहकार्य करावं.
- असंघटित क्षेत्रातल्या मजुरांचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करून हा प्रश्न सोडवायला हवा.
- कामगार कायद्यात सुधारणांच्या दिशेने भारत सरकार निश्चितपणे पावले टाकत आहे.
- नॅशनल करीअर सर्विस पोर्टल नरेंद्र मोदींच्या हस्ते लाँच करण्यात आलं.
- गरीबांसाठी आम्ही तीन योजना आणल्या आहेत, तुमच्या घरी काम करणा-या श्रमिकांना या योजनेचा फायदा करुन द्या.
- माझ्यावर सर्वात जास्त हक्क श्रमिक वर्गाचा.
- मी गरीबी बघितली आहे, म्हणूनच गरीबी जाणून घेण्यासाठी मला कॅमेरामन घेऊन जाण्याची गरज भासत नाही.
- कधी कधी आपण कामगारांच्या हिताची गोष्ट करतो, पण यातून कामगार हितापेक्षा कामगार संघटनेचे हित जास्त होते, या दोघांमधील फरक समजून घेण्याची गरज.
- सर्वांच्या सहमतीनेच आम्ही कामगार कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न करत आहोत.
- मालक व कामगारांमध्ये कुटुंबाची भावना निर्माण झाली तर विकासाच्या रथाला कोणीही थांबवू शकणार नाही.
कामगार व मालकामध्ये कुटुंबाची भावना निर्माण नाही तर व्यवसाय चांगला चालणार नाही.
- कामगार दुःखी असेल तर देश सुखी कसा होणार.