शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

आज ऑटोरिक्षा बंद!

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

आज ऑटोरिक्षा बंद!

आज ऑटोरिक्षा बंद!
- नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाचे आवाहन
नागपूर : ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीने कल्याणकारी मंडळाचा प्रारूप अहवाल सादर केला, मात्र यावर अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. याशिवाय अवैध वाहतूक बंद करण्यासंदर्भात शासन उदासीन असल्याने आणि अटल पेन्शन योजना केवळ ४० वर्षांच्या ऑटोचालकापुरतीच मर्यादित असल्याने याविरोधात नागपूर जिल्हा ऑटो चालक-मालक महासंघाने बुधवारी ऑटोरिक्षा बंदचे आवाहन केले आहे.
ऑटोरिक्षाचालकाला जनतेचा सेवक असे संबांधेले जाते, परंतु शासन त्याला नागरी सेवेचा दर्जा देत नाही. पेन्शन, आरोग्य विमा योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आदी पोकळ आश्वासनच देत आल्याची टीका रिक्षाचालक संघटनांनी केली आहे. महासंघाचे महासचिव हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले,
राज्यातील साडेसहा लाख तर विदर्भातील ८० हजार ऑटोचालकांना केवळ आश्वासनांची पाने पुसली जात आहेत. ठोस कारवाई होत नाही. नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बैठक झाली. यात त्यांनी ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते, याशिवाय अवैध वाहतुकीवरही कारवाई करण्याची ग्वाही दिली होती, परंतु उपाययोजना नाहीच. उलट केंद्र शासनाच्या तीन योजना स्वीकारा नाही तर परवाना नूतनीकरण होणार नाही, या प्रकारचा दबाव आणला जात आहे. म्हणूनच अखिल भारतीय कामगार संघटना, संयुक्त समितीद्वारा घोषित बंदमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. या बंदला १२ विविध संघटनांनी समर्थन दिले आहे. बुधवारी नागपुरातील खासगी व व्यावसायिक असे २५ हजारावर ऑटोरिक्षा बंदमध्ये सहभागी होतील. तसेच सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
-बंदला विरोध
आदर्श ऑटोरिक्षा चालक सेवा संघाने बंदला विरोध केला आहे. संघाचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले, हा बंद ऑटोरिक्षा चालकांच्या विरोधात आहे. काही संघटना रिक्षाचालकांना हाताशी धरून राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.
बॉक्स...
- या आहेत मागण्या
: ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी योजना लागू करावी.
: अवैध वाहतूक बंद करण्यात यावी
: ऑटोरिक्षा पार्किंगची व्यवस्था व्हावी
: सहा महिन्यावर रद्द झालेल्या ऑटो परवानाचे नूतनीकरण करण्यात यावे
: ऑटोचालकांना घरे देण्यात यावी