शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

हरियाणात लागणार स्वबळाची कसोटी

By admin | Updated: October 13, 2014 02:52 IST

स्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीस्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे. १५ आॅक्टोबर रोजी हरियाणातील १६.३० लाख मतदार ९० आमदारांना निवडून आणण्यासाठी मतदान करतील तेव्हा या जुगाराचा फैसला होणार आहे. भाजपाने स्वबळावर पूर्ण जागांवर उमेदवार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००४ चा अपवाद वगळता भाजपाने दिवंगत चौधरी देवीलाल, त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला किंवा भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याशी हातमिळवणी करीतच निवडणुका लढल्या. मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्याने भाजपाने हरियाणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मित्र पक्षांशी काडीमोड घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचा सल्ला मानत हरियाणात स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपचा सफाया झाला आणि या पक्षाला त्यानंतर मान वर काढता आली नाही. हा इतिहास गाठीशी असतानाही मोदींनी खेळलेला जुगार राजकीय पंडितांना धक्का देणारा आहे. यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर विधानसभा निवडणुकीत मते मागितली जात आहेत. निवडणुका जिंकल्या तर आमदारच नेता निवडणार का, हेही भाजपाने स्पष्ट केलेले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी विकासाच्या बाजूने आहे. दिल्लीतही आमचेच सरकार असल्यामुळे या राज्याचा मोठा विकास घडवून आणू असे आश्वासन मोदी देत आहेत. मोदींच्या १८ वर रॅलींनंतर निवडणुकीत काय होणार, मुख्यमंत्री कोण असणार, हे कुणीही सांगू शकत नाही. इंडिया टीव्ही- सी व्होटर, इंडिया टुडे -सिसेरो, एबीपी न्यूज- एसी नेल्सन या तीन सर्वेक्षण संस्थांनी हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती अवघडच आहे. हरियाणात मोदींसाठी मोठा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. जनाधार नसणे आणि त्या शक्तीचा प्रदेश नेता नसणे या प्रश्नांनीही अडचणीत भर घातली आहे. रामविलास शर्मा या जुन्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद असले तरी मधल्या काळात त्याचा प्रभाव ओसरल्यामुळे भाजपाला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका जिंकणे नेहमीच अवघड ठरले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे केवळ ४ आमदार निवडून आले तर ७२ जणांना अनामतही वाचवता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. परिणामी, स्वबळावर लढण्याची सर्वात दीर्घ परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आणि स्वबळावर लढण्याचा नवा प्रयोग करू पाहणारा भाजपा यांच्यातील लढाई रंगतदार वळणावर आली आहे. ०