शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शिवचरित्राच्या मुद्याकडे वेधले लक्ष

By admin | Updated: December 20, 2014 00:24 IST

सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीसावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल यासाठी प्रयत्न आणि एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्प चरित्र देण्याची चूक सुधारण्याची मागणी, हे लोकसभेत शुक्रवारी महाराष्ट्रासंबंधी झालेले ठळक कामकाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आक्षेपार्ह स्वरूपातील चरित्राचा विषय ‘लोकमत’ने उघडकीस आणला, याचाही यावेळी उल्लेख केला गेला.- सावकारीपाश मुक्ततेसाठी बळशेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न प्रश्न खा. सुनील गायकवाड यांनी विचारला. त्यावर सरकारने म्हटले, की देशात ७५ टक्के कर्ज बँकांमार्फतच शेतकरी घेतो. २५ टक्के कर्ज सावकारांकडून तो उचलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो त्याकडे वळू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. काही योजना तयार करता येईल का, हेही पाहू, सावकारी मोडून काढण्यासाठी काय कठोर उपाययोजना करता येतील ते पाहणेही आवश्यक आहे, असे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. यालाच जोडून, दुष्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर केली पाहिजे, असे म्हणणे खा. श्रीरंग बारणे यांनी मांडले. यावर सरकारने सांगितले की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वेगळा विभाग त्यासाठी निर्माण करणे गरजेचे नाही; परंतु प्रत्येक भौगोलिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन नियोजन केले जाईल. याच विषयावर बोलण्यासाठी नाना पटोले व राजीव सातव यांनीही हात उंचावले होते.