शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

By admin | Updated: June 7, 2015 23:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ५६ दिवसांच्या ‘आत्मचिंतन’ सुटीवरून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमकतेचा परिचय दिला आहे.राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयक ते रियल इस्टेट विधेयकासारख्या मुद्यांवर रालोआ सरकारची नाकेबंदी केली असताना हे मुख्यमंत्र्यांचे संमेलन होत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणींचे मुद्दे समोर करीत ते पुन्हा एकदा ‘सूट-बूट की सरकार’वर शरसंधान करतील, अशी चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, नेट न्यूट्रॅलिटी, आयआयटी-मद्रासमधील दलित विद्यार्थी संघटनेची रद्द झालेली मान्यता यासारख्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. (वृत्तसंस्था) > मेमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जबर धक्का बसल्यानंतर आणि दिल्लीसारख्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर होत असलेले हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे पहिले संमेलन आहे. > सध्या काँग्रेसकडे अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोरम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये सत्ता आहे. आसाम आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीच्या डावपेचांवरही चर्चा होऊ शकते. > सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये पक्षाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसकडे सत्ता नव्हती. माऊंट अबू, गुवाहाटी, दिल्ली आणि श्रीनगर येथे काँग्रेसची संमेलने झाली आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका आणि राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड लांबणीवर पडली असताना हे संमेलन होत आहे. जानेवारी २०१३ मध्ये जयपूर येथील चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. ———-पक्षाध्यक्षपदी निवड कधी?राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी आणि अ. भा. काँग्रेस समितीची बैठक कधी होणार, याबाबत पक्षनेतृत्वाने मौन पाळले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही बैठका होऊ शकतात, असे एका गटाला वाटते. राहुल गांधी लवकरच पक्षाध्यक्ष बनणार हा संदेश मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातून दिला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले.