शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार

By admin | Updated: June 7, 2015 23:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संमेलनात मोदी सरकारवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ५६ दिवसांच्या ‘आत्मचिंतन’ सुटीवरून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमकतेचा परिचय दिला आहे.राहुल गांधी यांनी भूसंपादन विधेयक ते रियल इस्टेट विधेयकासारख्या मुद्यांवर रालोआ सरकारची नाकेबंदी केली असताना हे मुख्यमंत्र्यांचे संमेलन होत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणींचे मुद्दे समोर करीत ते पुन्हा एकदा ‘सूट-बूट की सरकार’वर शरसंधान करतील, अशी चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, नेट न्यूट्रॅलिटी, आयआयटी-मद्रासमधील दलित विद्यार्थी संघटनेची रद्द झालेली मान्यता यासारख्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. (वृत्तसंस्था) > मेमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जबर धक्का बसल्यानंतर आणि दिल्लीसारख्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर होत असलेले हे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे पहिले संमेलन आहे. > सध्या काँग्रेसकडे अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोरम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये सत्ता आहे. आसाम आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने निवडणुकीच्या डावपेचांवरही चर्चा होऊ शकते. > सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये पक्षाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसकडे सत्ता नव्हती. माऊंट अबू, गुवाहाटी, दिल्ली आणि श्रीनगर येथे काँग्रेसची संमेलने झाली आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका आणि राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड लांबणीवर पडली असताना हे संमेलन होत आहे. जानेवारी २०१३ मध्ये जयपूर येथील चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. ———-पक्षाध्यक्षपदी निवड कधी?राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी आणि अ. भा. काँग्रेस समितीची बैठक कधी होणार, याबाबत पक्षनेतृत्वाने मौन पाळले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही बैठका होऊ शकतात, असे एका गटाला वाटते. राहुल गांधी लवकरच पक्षाध्यक्ष बनणार हा संदेश मुख्यमंत्र्यांच्या संमेलनातून दिला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले.