शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

हल्लाबोल ! "अखिलेश यादव यांच्या कुटुंबात कुणी सैनिक आहे?"

By admin | Updated: May 11, 2017 10:42 IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शहीद जवानांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात हल्लाबोल सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत देशातील शहीद जवानांसंदर्भात बुधवारी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी अखिलेश यांना धारेवर धरत त्यांच्याविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. 
 
देशाच्या प्रत्येक भागातील जवान शहीद झाले आहेत, मग गुजरातचा एकही कसा नाही, असा सवाल करत अखिलेश यादव यांनी बुधवारी गुजरातमधील जनतेच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  ‘उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दक्षिण भारतासह प्रत्येक ठिकाणचे जवान शहीद झाले आहेत, गुजरातच्या एखाद्या जवानाला हौतात्म्य आले असेल तर सांगा’, असे वादग्रस्त वक्तव्य अखिलेश यांनी बुधवारी केले. 
 
दरम्यान "अखिलेश यांचे हे विधान निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून केले गेले आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  "अखिलेश यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून करण्यात आले असून ही एक अत्यंत घाणेरडी राजकीय विचारसणी आहे", असे रुपानी म्हणाले आहेत. 
 
 
 #AkhileshInsultsMartyrs 
तर दुसरीकडे अखिलेश यांच्या विधानाचा नेटीझन्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर ट्विटरवर  #AkhileshInsultsMartyrs असा हॅशटॅग वापरुन युसर्ज अखिलेश यादव यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आहेत. 
 
आरएस शर्मा यांनी लिहिले आहे की, हे आहेत आमचे भावी राजकीय नेते - अखिलेश, केजरीवाल आणि राहुल. यावरुन देशाच्या भविष्याचा अंदाजा लावा.
 
अखिलेश आता पूर्णतः राहुल गांधी झाले आहेत, असेभोला एचएमपीयांनी ट्विट केले आहे. 
 
राजीव सूद यांनी तर अखिलेश यांच्या विधानावर संताप व्यक्त करत त्यांना प्रश्न विचारला आहे की, "मी विचारू शकतो का ? की तुमच्या कुटुंबात शहीद तर सोडा कुणी सैनिक तरी आहे का?".
 
 
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्ताच्या सैनिकांनी 1 मे रोजी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. 
 
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला.
 
या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या 200 व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले.  पाकिस्तानच्या सैन्यानं नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते.  
 
या घटनेवर प्रश्न उपस्थित करत अखिलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. 
भाजपा केवळ शहीद, देशभक्ती आणि वंदे मातरम या मुद्यांवर राजकारण करत आहे, असा आरोप यावेळी अखिलेश यांना केला. शिवाय सैनिकांचे शीर कापून नेले जात असताना सरकार काय करत आहे?, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला आहे.