शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

हल्लाबोल ! "अखिलेश यादव यांच्या कुटुंबात कुणी सैनिक आहे?"

By admin | Updated: May 11, 2017 10:42 IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शहीद जवानांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात हल्लाबोल सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत देशातील शहीद जवानांसंदर्भात बुधवारी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी अखिलेश यांना धारेवर धरत त्यांच्याविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. 
 
देशाच्या प्रत्येक भागातील जवान शहीद झाले आहेत, मग गुजरातचा एकही कसा नाही, असा सवाल करत अखिलेश यादव यांनी बुधवारी गुजरातमधील जनतेच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  ‘उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दक्षिण भारतासह प्रत्येक ठिकाणचे जवान शहीद झाले आहेत, गुजरातच्या एखाद्या जवानाला हौतात्म्य आले असेल तर सांगा’, असे वादग्रस्त वक्तव्य अखिलेश यांनी बुधवारी केले. 
 
दरम्यान "अखिलेश यांचे हे विधान निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून केले गेले आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  "अखिलेश यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून करण्यात आले असून ही एक अत्यंत घाणेरडी राजकीय विचारसणी आहे", असे रुपानी म्हणाले आहेत. 
 
 
 #AkhileshInsultsMartyrs 
तर दुसरीकडे अखिलेश यांच्या विधानाचा नेटीझन्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर ट्विटरवर  #AkhileshInsultsMartyrs असा हॅशटॅग वापरुन युसर्ज अखिलेश यादव यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आहेत. 
 
आरएस शर्मा यांनी लिहिले आहे की, हे आहेत आमचे भावी राजकीय नेते - अखिलेश, केजरीवाल आणि राहुल. यावरुन देशाच्या भविष्याचा अंदाजा लावा.
 
अखिलेश आता पूर्णतः राहुल गांधी झाले आहेत, असेभोला एचएमपीयांनी ट्विट केले आहे. 
 
राजीव सूद यांनी तर अखिलेश यांच्या विधानावर संताप व्यक्त करत त्यांना प्रश्न विचारला आहे की, "मी विचारू शकतो का ? की तुमच्या कुटुंबात शहीद तर सोडा कुणी सैनिक तरी आहे का?".
 
 
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्ताच्या सैनिकांनी 1 मे रोजी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. 
 
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला.
 
या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या 200 व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले.  पाकिस्तानच्या सैन्यानं नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते.  
 
या घटनेवर प्रश्न उपस्थित करत अखिलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. 
भाजपा केवळ शहीद, देशभक्ती आणि वंदे मातरम या मुद्यांवर राजकारण करत आहे, असा आरोप यावेळी अखिलेश यांना केला. शिवाय सैनिकांचे शीर कापून नेले जात असताना सरकार काय करत आहे?, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला आहे.