शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:19 IST

नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर सत्य आणि त्यांचे संरक्षण याला आमचा पक्ष प्राधान्य देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेसच्या १३३ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भलेही निवडणुका हरल्या तरी, आमचा पक्ष सत्याचे संरक्षण करेल. घटनेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, राज्यघटना ही आमच्या देशाचा आधार आहे. जे काँग्रेस पक्षाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यावर हल्ले केले जात आहेत. ज्या दिवशी आम्ही राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी ठरविले की, सर्व जाती, धर्म यांना समान महत्त्व दिले जावे. पण, हे सरकार आणि भाजपा भेदभाव करत समाजाची विभागणी करण्याचे काम करत आहे. आज प्रत्येक भारतीय आणि काँग्रेस पक्षाचे हे कर्तव्य आहे की, राज्यघटना आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकाराचे संरक्षण केले जावे. भाजपाकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचारावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी खोट्याचा आधार घेतला जात आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्यात हाच फरक आहे की, आम्हाला कदचित त्रास होऊ शकतो, आम्ही काही गमवू शकतो. पण, आम्ही सत्याचे संरक्षण करू.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी