शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:19 IST

नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली : भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर सत्य आणि त्यांचे संरक्षण याला आमचा पक्ष प्राधान्य देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेसच्या १३३ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भलेही निवडणुका हरल्या तरी, आमचा पक्ष सत्याचे संरक्षण करेल. घटनेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, राज्यघटना ही आमच्या देशाचा आधार आहे. जे काँग्रेस पक्षाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यावर हल्ले केले जात आहेत. ज्या दिवशी आम्ही राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी ठरविले की, सर्व जाती, धर्म यांना समान महत्त्व दिले जावे. पण, हे सरकार आणि भाजपा भेदभाव करत समाजाची विभागणी करण्याचे काम करत आहे. आज प्रत्येक भारतीय आणि काँग्रेस पक्षाचे हे कर्तव्य आहे की, राज्यघटना आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकाराचे संरक्षण केले जावे. भाजपाकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचारावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी खोट्याचा आधार घेतला जात आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्यात हाच फरक आहे की, आम्हाला कदचित त्रास होऊ शकतो, आम्ही काही गमवू शकतो. पण, आम्ही सत्याचे संरक्षण करू.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी