शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

आठवले, भामरे केंद्रात!

By admin | Updated: July 5, 2016 07:07 IST

केंद्रातील मोदी सरकारचा मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

केंद्रातील मोदी सरकारचा आज मंगळवारी विस्तार होत असून, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन वा तीन अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले आणि भाजपाचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची नावे पुढे असून, खा. विनय सहस्रबुद्धे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. विस्तारात १२ जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल आणि काहींना बाजूला केले जाईल, असे कळते. मोदी, अर्थमंत्री जेटली आणि अमित शाह यांच्या बैठकीत मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्र्यांचा शपथविधी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रेसिडेन्शिअल पॅलेसमध्ये होणार आहे. जेटली यांच्याकडे असलेले माहिती आणि प्रसारण खाते नव्या मंत्र्यांकडे जाईल, असे कळते. मात्र त्यांच्याकडे कायदा खात्याची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोव्याचे श्रीपाद नाईक यांना पुन्हा राज्यात पाठवले जाणार असल्याचे बोलले जाते. पक्ष विलीनीकरणास आठवलेंचा नकारउत्तर प्रदेशातील अनुप्रिया पटेल या अपना दलाच्या असून, त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच पद्धतीने रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाही भाजपामध्ये विलीन करावा, असे भाजपा नेत्यांनी त्यांना सूचित केले आहे.मात्र आठवलेंनी मंत्रिपदासाठी पक्षावर तुळशीपत्र ठेवण्यास नकार दिला आहे. त्यांना राज्यमंत्री दिले जाऊ शकते. कुणाला प्रमोशन, कुणाला डच्चूफेरबदलामध्ये ज्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता आहे, त्यात पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान आणि मुख्तार अब्बास नकवी, जयंत सिन्हा यांची नावे आहेत. त्याचबरोबर कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल, अशी चर्चा आहे. मनसुख बसावा, आर. एस. कथेरिया, एम.के. कुंडारिया, निहालचंद, संवरलाल जाट, विजय सांपला यांनाही डच्चू मिळेल, असे दिसत आहे. सदानंद गौडा यांना मंत्रिपदी ठेवताना त्यांच्याकडील कायदा खाते मात्र काढले जाईल, असे कळते. सहस्रबुद्धेंचे काय?सोमवारी अमित शाह यांना अनेक खासदार भेटले. त्यात आठवले, डॉ. भामरे यांच्याबरोबर खा. एस. एस. अहलुवालिया, राजस्थानचे पी. पी. चौधरी, उत्तर प्रदेशातील अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, महेंद्र पांडे, विजय गोयल, एम. जे. अकबर, मध्य प्रदेशचे अनिल दवे, गुजरातचे मनसुखभाई मांडाविया, पुरुषोत्तम रुपाला, फग्गनसिंग कुलस्ते, कृष्ण राज, जसवंतसिंग भाबोरे, अर्जुन मेघवाल आणि अजय टमटा यांचा समावेश होता. दरम्यान, विनय सहस्रबुद्धे यांचा निश्चित समावेश होईल, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.19 नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता असून, सहा जणांना डच्चू मिळू शकतो. मात्र, यात कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचा समावेश नसेल, असे सूत्रांनी सांगितले.