शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दिल्लीत आश्वासनांची साखरपेरणी !

By admin | Updated: January 18, 2015 02:10 IST

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले.

फडणवीस शिष्टमंडळाचा दौरा : जेटली, पासवान म्हणाले, ‘पॅकेज देऊ’नवी दिल्ली : अडचणीत सापलेल्या राज्यातील साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज मिळेल, या अपेक्षेने दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला गोड आश्वासनापलीकडे काही हाती लागले नाही.ऊसदाराच्या प्रश्नावरून दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारची कानउघाडणी केल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण, ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले. शिष्टमंडळात केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, साखर संघाचे अध्यक्ष व खा. विजयसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, खा. श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.शिष्टमंडळाने जेटलींंना दिलेल्या निवेदनात २० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करून प्रति मेट्रिक टन ५ हजार रुपये सबसीडी मिळावी, साखर विकास निधीतून देण्यात आलेल्या ३ वर्षांसाठीच्या कर्जाला काही वर्षे मुदतवाढ, ५० लाख मेट्रिक टनांपर्यंत केंद्रीय बफर स्टॉक, यातून येणारे व्याज कारखान्यांना देण्याचा विचार करावा तसेच भाव व उत्पादन खर्चात तफावत असल्याने कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशा मागण्या केल्या. त्यावर २१ जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, एवढेच आश्वासन जेटली यांनी दिले. साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिलाच पाहिजे अन्यथा त्यांची साखर जप्त केली जाईल, असा इशारा सहकार मंत्र्यांनी दिला. मात्र भाव गडगडल्यामुळे कारखानदारांनी हे पैसे कुठून द्यायचे, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकारशी आमची चर्चा सकारात्मक झाली. केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. या भेटीबाबत मी आनंदी व समाधानी आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीमागील दोन पंधरवाड्यांचे शेतकऱ्यांचे बिल कारखान्यांनी एकत्रितपणे द्यावे, अशी मागणी असून एफआरपीनुसार भाव मिळावा, यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील.- राजू शेट्टी, खासदार