शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

१०४ वर्षीय चंद्रधर दास यांचं निधन; “भारताचं नागरिकत्व मिळावं ही शेवटची इच्छा होती, पण...”

By प्रविण मरगळे | Updated: December 15, 2020 12:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले?

ठळक मुद्देचंद्रधर यांना नेहमी अपेक्षा होती की, एक दिवस त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेलते जिथे कुठे नरेंद्र मोदींचा फोटो असेल तिथे हात जोडून नमस्कार करत होतेभारताचं नागरिकत्व घेऊन जीवन संपवण्याचं त्यांची अखेरची इच्छा होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होण्यास उशीर झाला

गुवाहाटी – आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला, तेव्हापासून स्वत:वरील परदेशी असल्याचा ठपका हटवण्यासाठी आस लावून बसलेले १०४ वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी निधन झालं. २ वर्षापूर्वी त्यांना परदेशी नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याठिकाणी ३ महिने घालवल्यानंतर दास यांना जामीन मिळाला होता, मागील काही दिवसांपासून ह्दयाच्या आजाराने ग्रस्त असलेले दास यांनी परदेशी म्हणूनच दम तोडला.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार दास यांची मुलगी न्युती यांना ते दिवस आठवतात, जेव्हा चंद्रधर दास हे मोबाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते, पंतप्रधानांचे भाषण ऐकून हसत ते म्हणाले, नरेंद्र मोदी देव आहेत, नागरिकत्व सुधारणा कायद्याने ते समस्येवर तोडगा काढतील, आपण सगळे भारतीय होऊ, चंद्रधर यांना नेहमी अपेक्षा होती की, एक दिवस त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल, ते जिथे कुठे नरेंद्र मोदींचा फोटो असेल तिथे हात जोडून नमस्कार करत होते असं न्युतीने सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले? चंद्रधर यांना फक्त भारतीय म्हणून मरायचं होतं, आम्ही खूप प्रयत्न केले, कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, वकिलांपासून सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सर्व कागदपत्रे जमा केली आणि आता चंद्रधर दास जग सोडून गेले, आम्ही आताही कायद्याच्या दृष्टीने परदेशी आहोत. नागरिकत्व सुधारणा कायद्याने आमच्यासाठी काहीच केले नाही अशी खंत दास यांची मुलगी न्युतीने व्यक्त केलं.

काय आहे चंद्रधर दास यांची कहाणी?

चंद्रधर दास यांचा मुलगा गौरांगने सांगितले की, ते पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले होते, त्याठिकाणी खूप हत्या होत होत्या, त्यासाठी सीमा ओलांडून भारताच्या त्रिपुरामध्ये त्यांनी प्रवेश केला, याठिकाणी जवळपास ५०-६० दशकं वास्तव्य केले. त्रिपुरावरून दास यांनी संघर्ष करत आसाम गाठलं, उदरनिर्वाहासाठी ते लाडू विकत होते. त्यानंतर एकेदिवशी २०१८ मध्ये काही अधिकाऱ्यांनी दास यांना घरातून उचलून नेलं आणि परदेशी लोकांसाठी बनवण्यात आलेल्या डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवलं.

जून २०१८ मध्ये दास यांना जामीन मिळाला परंतु त्यांच्या कुटुंबाचे हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात दास यांना डिमेंशियाचा आजार झाला होता. ते खात-पित होते, झोपत होते, परंतु बोलणं कमी झालं होतं. जेव्हा ते बोलत होते तेव्हा खटल्याबद्दल विचारायचे. या समस्येवर मोदी लवकर तोडगा काढतील असा विश्वास चंद्रधर दास यांना होता. अजूनही खटल्याचा निकाल लागला नाही हे सांगण्याची हिंमत आमच्यात नव्हती. भारताचं नागरिकत्व घेऊन जीवन संपवण्याचं त्यांची अखेरची इच्छा होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होण्यास उशीर झाला आणि शेवटी परदेशी म्हणूनच चंद्रधर दास यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.

दरम्यान, चंद्रधर यांच्या मृत्युनंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दास यांच्या कुटुंबाची भेट घेत नागरिकत्व सुधारणा कायदा फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी आणलं होतं, तसेच डिटेंशन कॅम्पमध्ये असणाऱ्या लोकांना भाजपा मदत करत नाही असा आरोप त्यांनी केला तर भाजपा खासदार राजदीप राय यांनी दास यांच्या निधनावर शोक व्यक्त करत जे घडलं ते दुर्दैवी आहे. कोरोना महामारीमुळे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या प्रक्रियेत विलंब झाला असं त्यांनी सांगितले.  

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान