शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे उद्या लोकार्पण

By admin | Updated: April 1, 2017 21:52 IST

उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे २ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शानदार लोकार्पण होत आहे.

 ऑनलाइन लोकमत चेनानी, दि. 1 -  जम्मू काश्मिरमधे जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग ४४ वरील उधमपूर ते रामबन या १0.८९ कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे २ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते शानदार लोकार्पण होत आहे. भारताची रस्ता वाहतूक विश्वस्तरीय बनवण्याच्या उद्देशाने व पायाभूत सुविधांच्या विस्तारीकरणाच्या निर्धाराने कार्यरत असलेल्या, नितीन गडकरींच्या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या इतिहासात चेनानी -नाशरी या महत्वपूर्ण बोगद्याच्या लोकार्पण सोहळयाने एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. 

देशातील सर्वात लांब अंतराच्या या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २0११ रोजी सुरू झाले. २0१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नितीन गडकरींनी २५१९ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाचा फास्ट ट्रॅक योजनेत समावेश केला. हिमालयाच्या शृंखलेतील खालच्या पर्वतरांगांमधे १२00 मीटर्सच्या उंचीवरील ही योजना त्यामुळेच अवघ्या ३ वर्षात साकार झाली. जम्मू श्रीनगर या २८६ कि.मी. अंतराच्या ४ लेन महामार्गावर या बोगद्याचे प्रत्यक्ष अंतर ९.२ किलोमीटर्सचे आहे. बोगद्याच्या दोन्ही तोंडापाशी दोन पूल तयार करण्यात आल्याने बोगद्याचा प्रकल्प १0.८९ कि.मी.अंतराचा झाला आहे. जम्मू श्रीनगर दरम्यानचे अंतर या बोगद्यामुळे सुमारे ४0 कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा वेळ तब्बल अडीच तासांनी वाचणार आहे. लोकार्पण सोहळयाच्या एक दिवस आधी शनिवारी दिल्लीतील पत्रकारांच्या पथकाला या बोगद्याचा प्रत्यक्ष प्रवास घडवून ही माहिती आयएलएफएसच्या अधिकाऱ्यांनी पुरवली. 

जम्मू काश्मिरमधे पर्वताच्या आतून तयार करण्यात आलेल्या आशिया खंडातील या सर्वात मोठया व लक्षवेधी बोगद्याची वैशिष्ठये अनेक आहेत. अर्धवर्तुळाकार मुख्य बोगद्याची लांबी ९.२0 कि.मी. व रूंदी ९.३५ मीटर्स आहे. याखेरीज दोन्ही बाजूला १.३0 मीटर्सचे पादचारी मार्ग आहेत. याच बोगद्याला जोडून समांतर रेषेत दुसरा एक बोगदाही तयार करण्यात आला आहे. बंद पडलेल्या वाहनांमुळे बोगद्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. दोन्ही बोगद्यांना जोडणारे २९ क्रॉसिंग टनेल्स आहेत. प्रत्येक क्रॉसिंग ३५ मीटर्स लांबीचे आहे. 

बोगद्यातील वाहतूक सुरळीतपणे चालावी यासाठी एकिकृत ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम, आकर्षक विद्युत रोषणाई, प्रवेश नियंत्रण प्रणाली, विद्युत आग संकेत प्रणाली, उत्तम दर्जाची अग्निशमन व्यवस्था, २४ तास व्हिडीओव्दारे वाहतुकीची देखरेख, एफ एम रिब्रॉडकास्ट व्यवस्था, वायरलेस कम्युनिकेशन, उत्तम दर्जाचे वायुविजन, संकटाची माहिती देण्यासाठी प्रत्येक १५0 मीटर्सवर एसओएस कॉल व्यवस्था, अशा अनेक आधुनिक यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अत्यंत कठीण भागात स्थापत्य कलेचा हा उत्तम अविष्कार आहे. बोगदा पर्वताच्या आतून असल्याने वृक्षतोड अथवा पर्यावरणाची कोणतीही हानी या प्रकल्पात झालेली नाही. 

जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आॅरलँड व लायरडेल मार्गावर नॉर्वेत आहे. त्याची लांबी २४.५१ कि.मी.आहे. त्याखालोखाल आशिया खंडातल्या सर्वात मोठया बोगद्याची निर्मिती भारतात झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे आज लोकार्पण होत आहे.