शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
4
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
5
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
6
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
7
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
8
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
9
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
10
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
11
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
12
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
13
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
14
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
15
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
16
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
17
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
18
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
19
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
20
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज

अशोक वाजपेयींनी पुरस्कार परत केला

By admin | Updated: October 8, 2015 04:05 IST

ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करीत वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा निषेध नोंदविला आहे. लेखक आणि विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. आम्ही हा पुरस्कार परत करीत त्यांच्या विचारांचे समर्थन करीत आहोत, असे वाजपेयी यांनी म्हटले. दादरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल वाजपेयी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अनमेकिंग इंडिया’ खुल्या पत्रात सरकारवर आसूड दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची असलेल्या ८८ वर्षीय लेखिका नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करताना सरकारला ‘अनमेकिंग इंडिया’ या शीषर्काखाली खुले पत्र पाठवत मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह लावले होते. दादरी येथे मोहम्मद इकलाखची गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमावाने हत्या केली. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली. अशा घटनांवर मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल नयनतारा यांनी या पत्रात केला होता.साहित्य अकादमीचे राजकारण नको - तिवारीलेखकांनी निषेध नोंदविण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबावा. साहित्य अकादमी ही सरकारी संघटना नसून ते स्वायत्त मंडळ असल्याने तेथे राजकारण आणू नये, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केले. ही राष्ट्रीय अकादमी आहे. विविध भाषांमधील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. तेव्हा त्याकडे सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून बघितले जाते. अशा स्थितीत लेखक पुरस्कार परत करीत असेल तर त्या सदिच्छेचे काय, असा सवालही त्यांनी केला.लेखक निषेधाशिवाय काय करू शकतात, असा सवाल वाजपेयी यांनी सहगल यांना भक्कम पाठिंबा दर्शविताना केला. १९९४ मध्ये ‘कही नही वही’ या काव्यसंग्रहासाठी वाजपेयी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.देशाच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ले केले जात आहेत. सहगल या मूळ भारताच्या कल्पनेच्या बाजूने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना तिरंगी सलाम.- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते.