शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अशोक वाजपेयींनी पुरस्कार परत केला

By admin | Updated: October 8, 2015 04:05 IST

ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करीत वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा निषेध नोंदविला आहे. लेखक आणि विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. आम्ही हा पुरस्कार परत करीत त्यांच्या विचारांचे समर्थन करीत आहोत, असे वाजपेयी यांनी म्हटले. दादरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल वाजपेयी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अनमेकिंग इंडिया’ खुल्या पत्रात सरकारवर आसूड दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची असलेल्या ८८ वर्षीय लेखिका नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करताना सरकारला ‘अनमेकिंग इंडिया’ या शीषर्काखाली खुले पत्र पाठवत मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह लावले होते. दादरी येथे मोहम्मद इकलाखची गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमावाने हत्या केली. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली. अशा घटनांवर मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल नयनतारा यांनी या पत्रात केला होता.साहित्य अकादमीचे राजकारण नको - तिवारीलेखकांनी निषेध नोंदविण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबावा. साहित्य अकादमी ही सरकारी संघटना नसून ते स्वायत्त मंडळ असल्याने तेथे राजकारण आणू नये, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केले. ही राष्ट्रीय अकादमी आहे. विविध भाषांमधील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. तेव्हा त्याकडे सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून बघितले जाते. अशा स्थितीत लेखक पुरस्कार परत करीत असेल तर त्या सदिच्छेचे काय, असा सवालही त्यांनी केला.लेखक निषेधाशिवाय काय करू शकतात, असा सवाल वाजपेयी यांनी सहगल यांना भक्कम पाठिंबा दर्शविताना केला. १९९४ मध्ये ‘कही नही वही’ या काव्यसंग्रहासाठी वाजपेयी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.देशाच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ले केले जात आहेत. सहगल या मूळ भारताच्या कल्पनेच्या बाजूने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना तिरंगी सलाम.- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते.