शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

अशोक वाजपेयींनी पुरस्कार परत केला

By admin | Updated: October 8, 2015 04:05 IST

ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : ज्येष्ठ लेखिका व विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या नयनतारा सहगल यांच्यापाठोपाठ ललित कला अकादमीचे अध्यक्ष अशोक वाजपेयी यांनीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करीत वैयक्तिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा निषेध नोंदविला आहे. लेखक आणि विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. आम्ही हा पुरस्कार परत करीत त्यांच्या विचारांचे समर्थन करीत आहोत, असे वाजपेयी यांनी म्हटले. दादरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगल्याबद्दल वाजपेयी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘अनमेकिंग इंडिया’ खुल्या पत्रात सरकारवर आसूड दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची असलेल्या ८८ वर्षीय लेखिका नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करताना सरकारला ‘अनमेकिंग इंडिया’ या शीषर्काखाली खुले पत्र पाठवत मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह लावले होते. दादरी येथे मोहम्मद इकलाखची गोमांस भक्षण केल्याच्या अफवेवरून जमावाने हत्या केली. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली. अशा घटनांवर मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल नयनतारा यांनी या पत्रात केला होता.साहित्य अकादमीचे राजकारण नको - तिवारीलेखकांनी निषेध नोंदविण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबावा. साहित्य अकादमी ही सरकारी संघटना नसून ते स्वायत्त मंडळ असल्याने तेथे राजकारण आणू नये, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी स्पष्ट केले. ही राष्ट्रीय अकादमी आहे. विविध भाषांमधील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. तेव्हा त्याकडे सन्मान आणि प्रतिष्ठा म्हणून बघितले जाते. अशा स्थितीत लेखक पुरस्कार परत करीत असेल तर त्या सदिच्छेचे काय, असा सवालही त्यांनी केला.लेखक निषेधाशिवाय काय करू शकतात, असा सवाल वाजपेयी यांनी सहगल यांना भक्कम पाठिंबा दर्शविताना केला. १९९४ मध्ये ‘कही नही वही’ या काव्यसंग्रहासाठी वाजपेयी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.देशाच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ले केले जात आहेत. सहगल या मूळ भारताच्या कल्पनेच्या बाजूने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना तिरंगी सलाम.- मनीष तिवारी, काँग्रेसचे नेते.