शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील,

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील, असा विश्वास व्यक्त करून याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. ईशान्य विभागाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.केंद्रीय ईशान्य विभाग विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण-पेन्शन, अणुऊर्जा राज्यमंत्री दोन दिवसांच्या भारत-आशियान व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.व्यवसायासाठी पूरक वातावरणासाठी संपर्क, दळणवळण आणि सुलभ नियम आवश्यक आहेत. ईशान्य भागाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या भागातील संपर्क व्यवस्थेवर विद्यमान सरकारचे मुख्यत्वे लक्ष दिले आहे. त्यातहत सिक्कीमला मागच्या वर्षी पहिले विमानतळ मिळाले. इटानगरलाही लवकरच विमानतळ मिळाले. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील रेल्वे संपर्काचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आम्ही आगरतळा ते बांगलादेशदरम्यान पहिली ट्रेन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात सरकारने विकसित करण्यात आलेल्या आंतदेर्शीय जलमार्गांचाही त्यांनी उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान देशांसोबत दृढ संबंध करण्यावर भर देत आहेत, तसेच ईशान्य विभागाच्या विकासावरही त्यांचा भर आहे. ईशान्य विभागात विपुल क्षमता असून, त्याचा लाभ घेण्यात आलेला नाही. तेव्हा या क्षमतेचा लाभ घेण्याची गरज आहेत. भारताचे आशियान देशांसोबत संबंध दृढ आहेत. भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. आशियान देशांसोबतच्या सहकार्याला ईशान्य विभागाकडून गती मिळाली आहे, असे ते भाषणात म्हणाले.ईशान्य भागातील पर्यटन क्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, अलीकडच्या काही वर्षात येथील पर्यटन वाढले आहे. अरुणाचल प्रदेशात सरकार भारतीय चित्रपट आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे. यावेळी रॉयल थाईचे राजदूत आणि आशियान संघटनेचे अध्यक्ष गाँगस्कदी यांनी भारतात व्यवसायासाठी उपलब्ध संधी जाणून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.आशियान देशांत इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रूनेई, लाओस, म्यान्मा, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. भारत-आशियान व्यवसाय परिषदेत भारतातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.