शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील,

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील, असा विश्वास व्यक्त करून याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. ईशान्य विभागाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.केंद्रीय ईशान्य विभाग विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण-पेन्शन, अणुऊर्जा राज्यमंत्री दोन दिवसांच्या भारत-आशियान व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.व्यवसायासाठी पूरक वातावरणासाठी संपर्क, दळणवळण आणि सुलभ नियम आवश्यक आहेत. ईशान्य भागाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या भागातील संपर्क व्यवस्थेवर विद्यमान सरकारचे मुख्यत्वे लक्ष दिले आहे. त्यातहत सिक्कीमला मागच्या वर्षी पहिले विमानतळ मिळाले. इटानगरलाही लवकरच विमानतळ मिळाले. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील रेल्वे संपर्काचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आम्ही आगरतळा ते बांगलादेशदरम्यान पहिली ट्रेन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात सरकारने विकसित करण्यात आलेल्या आंतदेर्शीय जलमार्गांचाही त्यांनी उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान देशांसोबत दृढ संबंध करण्यावर भर देत आहेत, तसेच ईशान्य विभागाच्या विकासावरही त्यांचा भर आहे. ईशान्य विभागात विपुल क्षमता असून, त्याचा लाभ घेण्यात आलेला नाही. तेव्हा या क्षमतेचा लाभ घेण्याची गरज आहेत. भारताचे आशियान देशांसोबत संबंध दृढ आहेत. भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. आशियान देशांसोबतच्या सहकार्याला ईशान्य विभागाकडून गती मिळाली आहे, असे ते भाषणात म्हणाले.ईशान्य भागातील पर्यटन क्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, अलीकडच्या काही वर्षात येथील पर्यटन वाढले आहे. अरुणाचल प्रदेशात सरकार भारतीय चित्रपट आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे. यावेळी रॉयल थाईचे राजदूत आणि आशियान संघटनेचे अध्यक्ष गाँगस्कदी यांनी भारतात व्यवसायासाठी उपलब्ध संधी जाणून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.आशियान देशांत इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रूनेई, लाओस, म्यान्मा, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. भारत-आशियान व्यवसाय परिषदेत भारतातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.