शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढविण्यात ‘आशियान’ सहकार्य : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील,

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आशादायी वातावरणामुळे भारत लवकरच पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करील, असा विश्वास व्यक्त करून याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. ईशान्य विभागाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.केंद्रीय ईशान्य विभाग विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण-पेन्शन, अणुऊर्जा राज्यमंत्री दोन दिवसांच्या भारत-आशियान व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.व्यवसायासाठी पूरक वातावरणासाठी संपर्क, दळणवळण आणि सुलभ नियम आवश्यक आहेत. ईशान्य भागाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या भागातील संपर्क व्यवस्थेवर विद्यमान सरकारचे मुख्यत्वे लक्ष दिले आहे. त्यातहत सिक्कीमला मागच्या वर्षी पहिले विमानतळ मिळाले. इटानगरलाही लवकरच विमानतळ मिळाले. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील रेल्वे संपर्काचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आम्ही आगरतळा ते बांगलादेशदरम्यान पहिली ट्रेन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. ब्रह्मपुत्र नदीच्या खालच्या भागात सरकारने विकसित करण्यात आलेल्या आंतदेर्शीय जलमार्गांचाही त्यांनी उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान देशांसोबत दृढ संबंध करण्यावर भर देत आहेत, तसेच ईशान्य विभागाच्या विकासावरही त्यांचा भर आहे. ईशान्य विभागात विपुल क्षमता असून, त्याचा लाभ घेण्यात आलेला नाही. तेव्हा या क्षमतेचा लाभ घेण्याची गरज आहेत. भारताचे आशियान देशांसोबत संबंध दृढ आहेत. भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकामी आशियान देशांसोबतच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असेल. आशियान देशांसोबतच्या सहकार्याला ईशान्य विभागाकडून गती मिळाली आहे, असे ते भाषणात म्हणाले.ईशान्य भागातील पर्यटन क्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, अलीकडच्या काही वर्षात येथील पर्यटन वाढले आहे. अरुणाचल प्रदेशात सरकार भारतीय चित्रपट आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे. यावेळी रॉयल थाईचे राजदूत आणि आशियान संघटनेचे अध्यक्ष गाँगस्कदी यांनी भारतात व्यवसायासाठी उपलब्ध संधी जाणून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.आशियान देशांत इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रूनेई, लाओस, म्यान्मा, कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. भारत-आशियान व्यवसाय परिषदेत भारतातून दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.