शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

आर्यभट्टांना न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती

By admin | Updated: February 22, 2015 00:08 IST

चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख वेदांच्या काही श्लोकांमध्ये आढळतो आणि आर्यभट्टसारख्या भारतीय खगोल अभ्यासकांना इसॅक न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती,

नवी दिल्ली : चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख वेदांच्या काही श्लोकांमध्ये आढळतो आणि आर्यभट्टसारख्या भारतीय खगोल अभ्यासकांना इसॅक न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती, असे प्रतिपादन देशातील एक अग्रगण्य वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. जी. माधवन नायर यांनी शनिवारी येथे केले.वेदांविषयीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना ७१ वर्षांचे पद्मविभूषण नायर असेही म्हणाले की, धातूनिर्मितीशास्त्र,बीजगणित, खगोलशास्त्र, गणित, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष अशा विषयांची पाश्चात्य जगाला ओळख होण्यापूर्वी कित्येक शतके आधी या विषयांचे विवेचन वेदांमध्ये आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये केल्याचे आढळते.परंतु वेदांमधील हे वैज्ञानिक ज्ञान सूत्रबद्ध रूपात लिहिलेले होते त्यामुळे आधुनिक विज्ञानास त्याचा स्वीकार करणे जड गेले, असे सांगून नायर म्हणाले की, एका वेदामधील काही श्लोकांत चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख आहे, पण त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. नायर म्हणाले की, ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान’ मोहिमेने चंद्रावर पाणी असल्याचे सप्रमाण सिद्ध केले व तसे करणारा भारत हा पहिला देश ठरला. वेदांमधील वैज्ञानिक ज्ञान संस्कृतमध्ये व सूत्रांच्या रूपाने लिहिलेले असल्याने त सामान्यांना समजण्यास कठीण आहे.नायर पुढे असे म्हमाले की, ‘इस्रो’ने ‘चांद्रयान’ मोहिमेसाठी आर्यभट्ट यांच्या समिकरणांचा उपयोग केला. पृथ्वी आणि अन्य ग्रहांच्या गुरुत्वीय बलाचे ज्ञान भारतीयांना आधीपासूनच होते व न्यूटनने त्याचा शोध लावण्याच्या १५०० वर्षे आधी त्याचा उल्लेख भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो. सन २००३ ते २००९ अशी सलग सहा वर्षे ‘इस्रो’चे अध्यक्ष राहिलेल्या नायर यांनी असाही दावा केला की, हरप्पा संस्कृतीच्या काळात नगरे बांधण्यासाठी भूमितीय प्रमेयांचा वापर केला गेला आणि पायथागोरसचा सिद्धांत वैदिक काळापासून ज्ञात होता. प्लास्टिक सर्जरी आणि वामानशास्त्रासह अनेक प्रकारच्या वैज्ञानिक झानाचा प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये खजिना आहे, असे भाजपा आणि संघ परिवारातील अनेक नेते सांगत असता. प्रा. नायर यांची ही प्रतिपादनेही त्याच जातकुळीची आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)४पाचव्या शतकात होऊन गेलेल्या आर्यभट्ट या भारतीय खगोलतज्ञ व गणितीचा गौरव करताना प्रा. नायर म्हणाले की, आर्यभट्ट आणि भास्कर यांनी खगोलीय रचना आणि बाह्य ग्रहांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास केला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजही हे काम आव्हानात्मक मानले जाते.