शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

अरविंद केजरीवालांच्या "त्या" नातेवाईकाचं सोमवारीच झालं निधन

By admin | Updated: May 9, 2017 11:16 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यापासून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आपवर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यापासून कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आपवर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 2 कोटी रूपयांची लाच घेतली असा आरोप करून त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी सोमवारी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केले. सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांचे साडू सुरेंद्र कुमार बंसल यांच्यासाठी 50 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला होता, असा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत मंगळवारी(दि.9) सकाळी 11.30 वाजता सीबीआयकडे यासंदर्भातील पुरावे आपण सोपवणार असून, त्याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले. मात्र, ज्या सुरेंद्र कुमार बंसल यांचं नाव कपिल मिश्रांनी घेतलं त्याचं सोमवारीच निधन झालं.
 

दिल्लीतील मेदांत रुग्णालयात ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्या अंत्यसंस्कारात स्वतः केजरीवालही पोहोचले होते. बंसल आपल्या कुटुंबासह दिल्लीच्या प्रितमपुरा येथे राहात होते. त्यांच्या निधनामुळे दुःखी असलेल्या केजरीवालांचं कुटुंब मिश्रांच्या आरोपांमुळे आणखी  दुखावलं. स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी ट्विट करून आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं तसंच हा मुर्ख माणूस ज्या व्यक्तीचं आज निधन झालं आहे त्याच्यावर आरोप करत असल्याचं म्हटलं.

 
यानंतर आपच्या अनेक नेत्यांनी मिश्रांवर निशाणा साधला.  कपिल मिश्रा इतक्या खालच्या पातळीवर उतरलेत की ज्या सुरेंद्र कुमार बंसल यांचं आज निधन झालं त्यांच्यावरच असे बिनबुडाचे आरोप लावत आहेत असं ट्विट नेते संजय सिंग यांनी केलं.  

पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर अडचणींचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाने रविवारी पुढचा अंक गाठला होता. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी थेट केजरीवालांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातून निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. कपिल मिश्रा यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे असा आरोप करत मिश्रांनी खळबळ उडवून दिली होती. केजरीवाल मंत्रिमंडळात काम करताना अनेक गैरप्रकार आढळून आले. याबाबत मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना निवेदन दिल्याचे मिश्रांनी म्हटले होते. केजरीवाल आता पूर्वीसारखे राहिले नसून मुख्यमंत्री पदाने त्यांना बदलले आहे असे मिश्रा यांनी म्हटले होते. आपने कपिल मिश्रांचे आरोप फेटाळून लावत मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिल मिश्रा यांनी रविवारीच भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले होते. सोमवारीदेखील मिश्रा यांनी आपवर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यावर मला धमक्यांचे मेसेजेस आणि कॉल येत आहेत. माझी पक्षातून हकालपट्टी करुन दाखवा असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी भाजप आणि नरेंद्र मोदींचा विरोधक असून मी भाजपची भाषा बोलत असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे मिश्रांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी सकाळी सीबीआयकडे तक्रार करणार असून सीबीआयसमोर प्रत्यक्ष साक्षीदारही हजर करु असे मिश्रांनी म्हटले होते.