शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मानहानी प्रकरणी अरविंद केजरीवालांना कोर्टाकडून झटका

By admin | Updated: March 25, 2017 21:56 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी पतियाला कोर्टाने केजरीवाल यांच्यासहीत आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांवर विरोधात आरोप निश्चित केले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पतियाळा हाऊस कोर्टाने मोठा झटका दिवा आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी पतियाला कोर्टाने केजरीवाल यांच्यासहीत आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांवर विरोधात आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे. 
दरम्यान, यावेळी केजरीवाल आणि अन्य 5 जणांनी आपण निर्दोष असल्याचे कोर्टाला सांगितले 
 
अरविंद केजरीवाल यांनी डीडीसीए विरोधात गंभीर आरोप केले होते.  भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचे डीडीसीएने म्हटले आहे. त्यांच्या बेजाबदार वक्तव्यामुळे डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य केवळ टी. व्ही. पुरते मर्यादित न राहता, इंटरनेट आणि वृत्तपत्रांमध्ये देखील आले होते. त्यामुळे देखील डीडीसीएला नुकसान झाल्याचे अर्जात म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाक्याचा संदर्भ देऊन किर्ती आझाद यांनी देखील त्या वाक्याचा वेळोवेळी उच्चार केला होता.
 
काय आहे नेमकं प्रकरण ?
अरुण जेटली यांनी डिसेंबर 2015मध्ये केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चड्डा आणि दीपक बाजपेयी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावेळी या सर्वांनी डीडीसीएशी संबंधित खोट आणि अपमानकारक विधान केले होते. यामुळे प्रतिमा मलिना झाल्याचे जेटलींनी म्हटले होते. शिवाय आप नेत्यांनी जेटलींवर डीडीसीएमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप केला होता. जेटली हे 2013 पर्यंत डीडीसीएचे अध्यक्ष होते.