शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

अरविंद केजरीवाल हे तर नक्षलवादी- सुब्रमण्यम स्वामी

By admin | Updated: May 19, 2015 14:56 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे नक्षलवादी असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे नक्षलवादी असल्याची घणाघाती  टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.  केजरीवाल यांनी कारण नसताना हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात रस नसून महत्वाच्या विषयांवरून जनतेचे लक्ष हटवून दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. 
'निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने आपण पूर्ण करू शकत नाही, याची केजरीवाल यांन जाणीव झाली आहे. मुळात ते एक नक्षलवादी आहेत, त्यांना सरकार चालवण्यात रस नाही ' असे ते म्हणाले. ' दिल्लीतील जनतेला वाय-फाय सारखी सामान्य सुविधा देण्याचे वचनही (त्यांना) पूर्ण करता आलेले नाही. ते फक्त या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत', अशी टीकाही स्वामी यांनी केली आहे. यापूर्वीही स्वामी यांनी अनेकवेळा केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
दरम्यान हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत पोचला असून  आज केजरीवाल आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत