शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरले अरविंद केजरीवाल

By admin | Updated: April 14, 2017 18:16 IST

दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना जोरदार झटका दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आपली रणनिती बदलली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 14 - दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना जोरदार झटका दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आपली रणनिती बदलली आहे. यापुढे दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य न करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. 
 
थेट मोदींवर हल्लाबोल करण्याऐवजी आम्ही पॉझिटिव्ह कॅम्पेनवर भर देणार आहे. 2015 दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही  पॉझिटिव्ह कॅम्पेनवर भर दिला होता. तीच रणनिती आता दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अवलंबणार आहोत. दिल्लीमध्ये आपचे सरकार असताना 49 दिवसात काय बदल झाला ते मतदारांच्या मनावर बिंबवले होते. तसाच प्रचार आता करणार आहोत असे आप नेत्याने सांगितले. 
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या दोन्ही राज्यातील मतदार दिल्लीमध्ये मोठया संख्येने आहेत हे सुद्धा मोदींना टार्गेट न करण्यामागचे एक कारण आहे. दिल्लीत थेट मोदींनी लक्ष्य करणे उलटू शकते असे आप नेत्याने सांगितले.