शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अरूंधती रॉयही परत करणार 'राष्ट्रीय पुरस्कार'

By admin | Updated: November 5, 2015 13:41 IST

देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेत लेखिका अरूंधती रॉयही उतरल्या असून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेत 'बुकर'  पुरस्कार विजेत्या, प्रख्यात लेखिका अरूंधती रॉय याही उतरल्या असून त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात विचारवंतांची होणारी हत्या, अल्पसंख्यांकावर होणारे हल्ले आणि बीफच्या बंदी या सर्व घटनांच्या निषेधार्थ रॉय यांनी हे पाऊल उचलले आहे. 
रॉय यांना १९८९ साली आलेल्या ' IN which Annie Gives it those ones' या चित्रपटाच्या पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तोच पुरस्कार परत करण्याचा निर्णय रॉय यांनी घेतला आहे. देशातील नागरिकांना होणारी मारहाण, जाळपोळीत त्यांचा होणारा मृत्यू, विचारवंतांची हत्या या सर्व भीषण गोष्टी असून त्यासाठी 'असहिष्णू' हा शब्द वापरणे अयोग्य आहे. या देशातील नागरिकांना जिवंतपणीही हाल सहन करावे लागतात त्यामुळे देशात जे काही सुरू आहे, त्याची मला लाज वाटते असे रॉय यांनी नमूद केले आहे. 
तसेच देशात काँग्रेसची सत्ता असतानाही आपण 'साहित्य अकादमी पुरस्कार' नाकारला होता असे सांगत त्यामुळे आपल्या या कृतीला भाजपा विरुद्ध काँग्रेस असा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
दरम्यान चित्रपट निर्माते कुंदन शहा यांनीही 'जाने भी दो यारो' या प्रसिद्ध चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करणार असल्याची घोषित केले आहे. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक दिग्दर्शकांनाही पुरस्कार परत केले आहेत.