शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

अरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची आत्महत्या

By admin | Updated: August 10, 2016 04:21 IST

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे

इटानगर : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी मंगळवारी येथे कथितरीत्या आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर ईशान्येकडील या राज्यात हिंसक निदर्शनांना तोेंड फुटले आहे. संतप्त निदर्शकांनी उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांच्या बंगल्यात तोडफोड केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यासह मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या भागाची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी कालिखो यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून अरुणाचलमध्ये काँग्रेसचे सरकार बहाल केले होते.पुल यांनी येथील मुख्यमंत्री निवासस्थान अद्याप रिकामे केले नव्हते. तेथेच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली, असे पोलिसांनी सांगितले. पुल यांनी शयनगृहातील पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या पत्नीला आढळून आले. सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्युसमयी ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन पत्नी आणि चार मुले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटले नव्हते. त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. पुल यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अनेक समर्थकांनी मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या बंगल्याला घेराव घालून पुल यांच्या अनैसर्गिक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याविरुद्ध बंड करून पुल यांनी भाजपच्या मदतीने १९ फेब्रुवारी रोजी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर १३ जुलैपर्यंत ते मुख्यमंत्रिपदी पाहिले. लहानपणी आई आणि वडील वारल्यानंतर अनाथ असलेल्या सुतारकामापासून कारकीर्द सुरू केली. सरकारी अधिकाऱ्यांकडील सुतारकाम करताना, त्यांनी पुढे रात्रशाळेत शिक्षण घेतले. पुल पुढे सुरक्षारक्षक व त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री बनले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली.