शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग गेला वाहून

By admin | Updated: July 4, 2017 14:47 IST

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे

ऑनलाइन लोकमत
ईटानगर, दि. 4 - अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी ईटानगरसहीत सोमवारी (3 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत तर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे.  
 
जोरदार झालेल्या या पावसात नहार्लगुन आणि ईटानगरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 415 चा मोठा भाग वाहून गेला आहे. सध्या युद्धपातळीवर या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. खबरदारी म्हणून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ईटानगर आणि नहार्लगुनला जोडणारा जुलांग रोडदेखील पावसात खचल्यानं मोठे नुकसान झालं आहे. 
 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदी किनार, भूस्खलनाच्या दृष्टीनं अति संवेदनशील परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्लाही त्यांना  देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
या नैसर्गिक आपत्तीचा मुख्यमंत्र्यांनी अहवाल सोपवण्यात येणार असून मदतीसाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जातील, असे येथील अधिका-यांनी सांगितले आहे.  दरम्यान, सगलीमध्ये अडकलेले चार रुग्ण, तीन मुलं, महिला आणि विद्यार्थ्यांसहीत 20 पेक्षा अधिक जणांना विमानाच्या सहाय्याने नहार्लगुन येथे सुखरुप पोहोचवण्यात आले.