शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल, आसामला तडाखा

By admin | Updated: July 27, 2016 02:17 IST

अरुणाचलच्या नमसाई आणि पूर्व सियांग जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या भागात नोआ देहिंग, टेंगापानी आणि जेंगथू नद्यांंना आलेल्या

इटानगर : अरुणाचलच्या नमसाई आणि पूर्व सियांग जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या भागात नोआ देहिंग, टेंगापानी आणि जेंगथू नद्यांंना आलेल्या पुरामुळे अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पुरामुळे अनेक भागांत रस्ते वाहून गेले आहेत, तर पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. विजेचे खांब पडल्याने बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. राष्ट्रीय मार्ग ५२ वर पुरामुळे दोन पूल खचल्याने वाहतूक ठप्प आहे. नमसाई जिल्ह्यात पुराच्या पाण्याने ३,५०० हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. माशांचे ११५ तलाव बुडाले आहेत, तर २५० जनावरे, २०० बकऱ्या, दोन हजार कोंबड्या पुरात वाहून गेल्या आहेत किंवा मृत्युमुखी पडल्या आहेत. या पावसाने ३,५०० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री चाउना मीन आणि आमदार चाऊ जिंगनू हे जिल्ह्यात पाहणी करीत आहेत. सीआरपीएफच्या मदतीने आतापर्यंत २६० लोकांना वाचविण्यात आले आहे. २८ शिबिरे उघडण्यात आली आहेत. त्यामार्फत लोकांना मदत करण्यात येत आहे. काझीरंगात घुसले पाणी आसाममध्ये पुराची परिस्थिती गंभीर झाली आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या अनेक जिल्ह्यांतून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत. साडेबारा लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला असून, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पुराचे पाणी घुसले आहे. येथे लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सैन्याची मदत घेतली जात आहे. चिरांग जिल्ह्यातून २०० जणांना तर बोंगाईगाव येथून १५० जणांना वाचविण्यात यश आले आहे. मोरिगाव, जोरहाट आणि दिब्रूगढ जिल्ह्यात पुराच्या पाण्याने रस्ते वाहून गेले आहेत. दूरसंचार सेवा विस्कळीत झाली आहे. कोकराझार, जोरहाट, बोंगईगाव, दिब्रूगढ जिल्ह्यांत नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने अनेक गावांत पाणी शिरले आहे. आसाममधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकार एक पथक पाठविणार असल्याची माहिती राज्याचे जलसंसाधनमंत्री केशव महंत यांनी विधानसभेत दिली.