शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘असहिष्णू’ कलाकारांनीच परत केले पुरस्कार

By admin | Updated: October 14, 2015 00:49 IST

देशातील कथित ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ विरोधात आपले पुरस्कार परत करणाऱ्या देशातील साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी तिखट टीका केली.

नवी दिल्ली : देशातील कथित ‘वाढत्या असहिष्णुतेच्या’ विरोधात आपले पुरस्कार परत करणाऱ्या देशातील साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी तिखट टीका केली. हिंदू धर्म विकृत करणे आणि भारत नष्ट करण्याच्या प्रयत्नांतर्गत धर्मनिरपेक्षतेच्या काही ‘असहिष्णू’ ठेके दारांनीच आपले पुरस्कार परत केले आहेत, असे संघाने म्हटले.रा. स्व. संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रातील ‘दिन पलटे, बात उलटी’ शीर्षकाखालील ताज्या अग्रलेखात पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर कडवे ताशेरे ओढण्यात आले आहेत. देशात कुणाचीही सत्ता असो; पण धर्मनिरपेक्षतेच्या या ठेकेदारांना (पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना)नेहरू मॉडेलशिवाय अन्य काहीही स्वीकार्य नाही. तेच नेहरू ज्यांनी, १९३८ मध्ये जिन्ना यांना लिहिलेल्या पत्रात गोहत्या करणे मुस्लिमांचा मौलिक अधिकार असल्याचे म्हटले होते. शिवाय काँग्रेसी काळात गोहत्या जारी ठेवण्याचे वचन दिले होते. एवढेच नाही तर गोहत्या सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधानपद सोडण्याची तयारीही दाखवली होती. हिंदू धर्मास विकृत करणाऱ्या अशा लेखकांना शीख दंगलीतील दोषींच्या हातून स्वत:चा गौरव करून घेण्यात जराही वाईट वाटले नाही. काश्मिरातील विस्थापित हिंदंूबाबत हा वर्ग अवाक्षरही बोलला नाही.