शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

लष्कर कुठल्याही मोहिमेसाठी सज्ज - लष्करप्रमुख सुहाग

By admin | Updated: January 13, 2016 14:38 IST

लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी लष्कर कुठलीही मोहिम पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - ज्यांनी भारताला वेदना दिल्या, त्यांनाही तशाच वेदना झाल्या पाहिजेत. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सोमवारी म्हणाले होते. त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता हा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी बुधवारी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मात्र लष्कर कुठलीही मोहिम पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले. 
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुहाग म्हणाले की, अतिरेक्यांविरुध्द कारवाई सुरु असताना समन्वयाचा मुद्दा नव्हता. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय होता असे त्यांनी सांगितले. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर घुसलेल्या सहा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षापथकांना तीन दिवस लागल्याने सरकारवर टीका होत आहे. 
त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी समन्वयाच्या अभावाचा मुद्दा खोडून काढला. अतिरेकी ज्या इमारतीमध्ये होते त्या इमारतीमध्ये दोन सैनिक होते. सर्वप्रथम त्या सैनिकांना सुरक्षित बाहेर काढणे आवश्यक होते. ही कारवाई सोपी नव्हती. जिवीतहानी टाळण्यासाठी आम्ही वेळ घेतला असे सुहाग यांनी सांगितले.