शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

PoKमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्कराला हवेत 6 महिने

By admin | Updated: October 4, 2016 11:05 IST

सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4-पाकिस्तानकडून वारंवार होणा-या दहशतवादी कारवायांना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर प्रभावी उपाययोजना आखण्याचा विचार करत आहे. सीमेपलिकडील दहशतवाद्यांविरोधात लागोपाठ 6 महिने कारवाई केल्यास  पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांचे जबरदस्त नुकसान होऊ शकते, असे भारतीय लष्कराने सरकारला सांगितले आहे. एक-दोनदा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर दहशतवाद्यांचे काहीही नुकसान होणार नाही, त्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे असतील तर त्यासाठी मीडियम टर्म प्लान अंमलात आणणे गरजेचे आहे, असे लष्करातील वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले आहे. 
 
तसेच,काश्मीरमधील तणावपूर्वक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि अन्य परिसरात हल्ले होणाच्या संशयावरुन सरकारने सतर्क राहण्याची गरज आहे, असे देखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे. यावेळी रविवारी बारामुल्ला इथे बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लागोपाठ कारवाया कराव्या लागतील, असे लष्कराचे म्हणणे आहे. 
आणखी वाचा
लष्करातील वरिष्ठ अधिका-यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील दहशतवादी बॅकफुटवर आले आहेत, मात्र  गाफील न राहता त्यांना गंभीर स्वरुपात हादरा द्यावा लागेल. भारताने  केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आणखी तळ निर्माण होऊ शकतात, ती आधीच उद्ध्वस्त करुन, नियंत्रण रेषेपलिकडे हल्ला करण्यासाठी काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवावी लागणार असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
 
भारतीय लष्कर आणि गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार,  पाकव्याप काश्मीरमध्ये 40 पेक्षा जास्त दहशतादी प्रशिक्षण शिबिरे आहेत. ही सर्व शिबिरे दुर्गम ठिकाणी असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण रेषेजवळ 50 लॉन्च पॅड आहेत, ज्यात 200 हून अधिक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. ज्यांना पाकिस्तानी सैन्य आश्रय देत आहे.