शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याला हवी सीमापार हल्ल्याची परवानगी

By admin | Updated: September 20, 2016 05:47 IST

उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे.

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे. ७७८ कि.मी.च्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करण्याची मागणी सैन्याकडून होऊ शकते. मर्यादित पण, दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक इशारा देण्याचा यामागचा हेतू आहे. काश्मिरातील घुसखोरीत झालेली वाढ पाहता सरकारला सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा एक मतप्रवाह आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या भूभागात हल्ला किंवा गुप्त सैन्य अभियान, अशी कारवाई तूर्तास तरी होऊ शकत नाही. कारण, नियंत्रण रेषा न ओलांडताही भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करू शकते. सैन्य दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेही मत आहे की, कडक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश द्यायला हवा की, झाले ते पुरे झाले. पठाणकोट, मुंबई हल्ल्यासारखे अतिरेकी हल्ले आम्ही किती दिवस सहन करणार आहोत. याचा बदला आम्ही घेणार नाही का? आमचा हा दृष्टिकोन पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे धैर्य वाढवत आहे. यावर उपाय म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचाही पर्याय आहे. ९० कि.मी. हल्ल्याची क्षमता असलेल्या रॉकेटपासून ते २९० कि.मी.ची क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही वापर करता येऊ शकतो. प्रखर हवाई हल्ल्यामध्ये मिराज २०००, जग्वार आणि सुखोई-३० यांचा वापर करता येऊ शकतो; पण ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल, असा एक मतप्रवाह आहे. कारण, पाकिस्तानची सुरक्षाप्रणाली ही भारताच्या हवाई दलाचे नुकसान करू शकते, तर पाकिस्तानविरुद्धचा एक हल्लाही युद्धात रूपांतरित होऊ शकतो आणि पाकिस्तानने हे वारंवार सांगितलेले आहे की, ते भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करु शकतात.