शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

सैन्याला हवी सीमापार हल्ल्याची परवानगी

By admin | Updated: September 20, 2016 05:47 IST

उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे.

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे. ७७८ कि.मी.च्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करण्याची मागणी सैन्याकडून होऊ शकते. मर्यादित पण, दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक इशारा देण्याचा यामागचा हेतू आहे. काश्मिरातील घुसखोरीत झालेली वाढ पाहता सरकारला सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा एक मतप्रवाह आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या भूभागात हल्ला किंवा गुप्त सैन्य अभियान, अशी कारवाई तूर्तास तरी होऊ शकत नाही. कारण, नियंत्रण रेषा न ओलांडताही भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करू शकते. सैन्य दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेही मत आहे की, कडक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश द्यायला हवा की, झाले ते पुरे झाले. पठाणकोट, मुंबई हल्ल्यासारखे अतिरेकी हल्ले आम्ही किती दिवस सहन करणार आहोत. याचा बदला आम्ही घेणार नाही का? आमचा हा दृष्टिकोन पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे धैर्य वाढवत आहे. यावर उपाय म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचाही पर्याय आहे. ९० कि.मी. हल्ल्याची क्षमता असलेल्या रॉकेटपासून ते २९० कि.मी.ची क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही वापर करता येऊ शकतो. प्रखर हवाई हल्ल्यामध्ये मिराज २०००, जग्वार आणि सुखोई-३० यांचा वापर करता येऊ शकतो; पण ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल, असा एक मतप्रवाह आहे. कारण, पाकिस्तानची सुरक्षाप्रणाली ही भारताच्या हवाई दलाचे नुकसान करू शकते, तर पाकिस्तानविरुद्धचा एक हल्लाही युद्धात रूपांतरित होऊ शकतो आणि पाकिस्तानने हे वारंवार सांगितलेले आहे की, ते भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करु शकतात.