शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सैन्याला हवी सीमापार हल्ल्याची परवानगी

By admin | Updated: September 20, 2016 05:47 IST

उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे.

नवी दिल्ली : उरीतील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या सैन्याला आता सीमेपलीकडे हल्ला करायचा आहे. ७७८ कि.मी.च्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रे तैनात करण्याची मागणी सैन्याकडून होऊ शकते. मर्यादित पण, दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला कडक इशारा देण्याचा यामागचा हेतू आहे. काश्मिरातील घुसखोरीत झालेली वाढ पाहता सरकारला सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा एक मतप्रवाह आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाला सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या भूभागात हल्ला किंवा गुप्त सैन्य अभियान, अशी कारवाई तूर्तास तरी होऊ शकत नाही. कारण, नियंत्रण रेषा न ओलांडताही भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करू शकते. सैन्य दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असेही मत आहे की, कडक कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानला हा संदेश द्यायला हवा की, झाले ते पुरे झाले. पठाणकोट, मुंबई हल्ल्यासारखे अतिरेकी हल्ले आम्ही किती दिवस सहन करणार आहोत. याचा बदला आम्ही घेणार नाही का? आमचा हा दृष्टिकोन पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे धैर्य वाढवत आहे. यावर उपाय म्हणून आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचाही पर्याय आहे. ९० कि.मी. हल्ल्याची क्षमता असलेल्या रॉकेटपासून ते २९० कि.मी.ची क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही वापर करता येऊ शकतो. प्रखर हवाई हल्ल्यामध्ये मिराज २०००, जग्वार आणि सुखोई-३० यांचा वापर करता येऊ शकतो; पण ही कारवाई अतिशय काळजीपूर्वक करावी लागेल, असा एक मतप्रवाह आहे. कारण, पाकिस्तानची सुरक्षाप्रणाली ही भारताच्या हवाई दलाचे नुकसान करू शकते, तर पाकिस्तानविरुद्धचा एक हल्लाही युद्धात रूपांतरित होऊ शकतो आणि पाकिस्तानने हे वारंवार सांगितलेले आहे की, ते भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करु शकतात.