शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कराने निवडली 'अमावस्येची रात्र'

By admin | Updated: February 9, 2017 10:12 IST

किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो. समोर शत्रू तळावर शांतता असते. मृत्यू साक्षात आपल्याजवळ पोहोचला आहे याची शत्रूला कल्पनाही नसते. योग्य संधी आणि इशारा मिळताच कमांडो कारवाई सुरु होते. गोळीबाराचा आवाज कानावर पडताच गाफील शत्रू स्टेनगन हाती घेण्यासाठी धाव घेतो. 
 
तितक्यात दुस-या बाजूने गोळीबार सुरु होतो. हातबॉम्ब, ग्रेनेडच्या स्फोटांनी तळावर आगीचे लोळ उठतात. नेमके काय चालले आहे, कुठून हल्ला होतोय याचा काहीही अंदाज लागत नसल्याने शत्रू पूर्णपणे भांबावून गेलेला असतो. युद्धावर बेतलेल्या चित्रपटांमध्ये आपण अशा प्रकारची कमांडो कारवाई पाहिली आहे. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याच्या पॅरा कमांडोंनी 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री अशाच प्रकारची कारवाई करत शत्रूला नेस्तनाबूत केले.  
 
पॅरा रेजिमेंट ही भारतीय लष्कराची एलिट कमांडो फोर्स आहे. 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे लाँच पॅडस नष्ट केल्यानंतर सरकारने या कारवाईची आखणी कशी झाली, त्यात कोण सहभागी होते. याबद्दल माहिती देणे टाळले होते. पण टाइम्स ऑफ इंडियाने मिळवलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 19 पॅरा कमांडो सहभागी झाले होते. 
 
एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायाब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅरा कमांडो या सर्जिकल स्ट्राईक्सच्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. भारत सरकारने दिल्लीत 68 व्या प्रजासत्ताक दिनी या टीममधील सदस्यांचा विविध शौर्य पदकाने गौरव केला. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच या मोहिमेची आखणी सुरु केली होती. मोहिम फत्ते करण्यासाठी दाट काळोख असलेली अमावस्येची रात्र निवडण्यात आली होती. अखेर 28 सप्टेंबरची ती रात्र आली. हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी तळावरील सर्व बारीकसारीक हालचालींची पूर्ण माहिती जमवण्यात आली होती. मेजर रोहित सुरी यांनी आपल्या टीमला दहशतवाद्यांना लाँच पॅड जवळच्या मोकळया जागेत टार्गेट करण्याचे निर्देश दिले होते. 
 
मेजरी सुरी आणि त्यांच्या टीमने लाँच पॅडपासून 50 मीटर अंतरावर असताना दोन दहशतवाद्यांना लक्ष्य केले. मोकळया जागेत सापडलेल्या एका दहशतवाद्याला ठार केले. दोन दहशतवादी जंगलामध्ये पळत असल्याचे दिसताच त्यांनी मानवरहीत विमानाच्या मदतीने त्या दहशतवाद्यांचा माग काढला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सुरी दहशतवाद्यांना भिडले आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
असा हल्ला करण्यापूर्वी शत्रूच्या गोटातील सर्व माहिती मिळवण्यासाठी पॅरा कमांडोंचे आणखी एका विशेष पथक 48 तास आधीच नियंत्रण रेषा पार करुन दबा धरुन बसले होते. कुठे हल्ला करायचा, त्यासाठी कुठल्या जागा निवडायची याची तयारी आधीच त्या टीमने तिथे जाऊन केली होती. दहशवाद्यांचे शस्त्रास्त्रांचे भांडार नष्ट करताना दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
या कारवाई दरम्यान कमांडोंनी तळावरील एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. सर्जिकल स्ट्राईकची ही कारवाई सोपी नव्हती. दहशतवाद्यांकडूनही जोरदार गोळीबार झाला. पण आपल्या एकाही कमांडोची जिवीतहानी होऊ न देता सर्व दहशतवाद्यांना संपवून ही टीम पुन्हा सुखरुप आपल्या तळावर परतली.