शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कराने निवडली 'अमावस्येची रात्र'

By admin | Updated: February 9, 2017 10:12 IST

किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - किर्र काळोख पसरलेला, घनदाट जंगल, कानावर पडणारी रातकिडयांची किरकिर त्या जंगलामधून चोर पावलांनी वाट काढत लक्ष्यापर्यंत पोहोचलेले कमांडो. समोर शत्रू तळावर शांतता असते. मृत्यू साक्षात आपल्याजवळ पोहोचला आहे याची शत्रूला कल्पनाही नसते. योग्य संधी आणि इशारा मिळताच कमांडो कारवाई सुरु होते. गोळीबाराचा आवाज कानावर पडताच गाफील शत्रू स्टेनगन हाती घेण्यासाठी धाव घेतो. 
 
तितक्यात दुस-या बाजूने गोळीबार सुरु होतो. हातबॉम्ब, ग्रेनेडच्या स्फोटांनी तळावर आगीचे लोळ उठतात. नेमके काय चालले आहे, कुठून हल्ला होतोय याचा काहीही अंदाज लागत नसल्याने शत्रू पूर्णपणे भांबावून गेलेला असतो. युद्धावर बेतलेल्या चित्रपटांमध्ये आपण अशा प्रकारची कमांडो कारवाई पाहिली आहे. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्याच्या पॅरा कमांडोंनी 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री अशाच प्रकारची कारवाई करत शत्रूला नेस्तनाबूत केले.  
 
पॅरा रेजिमेंट ही भारतीय लष्कराची एलिट कमांडो फोर्स आहे. 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे लाँच पॅडस नष्ट केल्यानंतर सरकारने या कारवाईची आखणी कशी झाली, त्यात कोण सहभागी होते. याबद्दल माहिती देणे टाळले होते. पण टाइम्स ऑफ इंडियाने मिळवलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 19 पॅरा कमांडो सहभागी झाले होते. 
 
एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायाब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅरा कमांडो या सर्जिकल स्ट्राईक्सच्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. भारत सरकारने दिल्लीत 68 व्या प्रजासत्ताक दिनी या टीममधील सदस्यांचा विविध शौर्य पदकाने गौरव केला. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच या मोहिमेची आखणी सुरु केली होती. मोहिम फत्ते करण्यासाठी दाट काळोख असलेली अमावस्येची रात्र निवडण्यात आली होती. अखेर 28 सप्टेंबरची ती रात्र आली. हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी तळावरील सर्व बारीकसारीक हालचालींची पूर्ण माहिती जमवण्यात आली होती. मेजर रोहित सुरी यांनी आपल्या टीमला दहशतवाद्यांना लाँच पॅड जवळच्या मोकळया जागेत टार्गेट करण्याचे निर्देश दिले होते. 
 
मेजरी सुरी आणि त्यांच्या टीमने लाँच पॅडपासून 50 मीटर अंतरावर असताना दोन दहशतवाद्यांना लक्ष्य केले. मोकळया जागेत सापडलेल्या एका दहशतवाद्याला ठार केले. दोन दहशतवादी जंगलामध्ये पळत असल्याचे दिसताच त्यांनी मानवरहीत विमानाच्या मदतीने त्या दहशतवाद्यांचा माग काढला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सुरी दहशतवाद्यांना भिडले आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
असा हल्ला करण्यापूर्वी शत्रूच्या गोटातील सर्व माहिती मिळवण्यासाठी पॅरा कमांडोंचे आणखी एका विशेष पथक 48 तास आधीच नियंत्रण रेषा पार करुन दबा धरुन बसले होते. कुठे हल्ला करायचा, त्यासाठी कुठल्या जागा निवडायची याची तयारी आधीच त्या टीमने तिथे जाऊन केली होती. दहशवाद्यांचे शस्त्रास्त्रांचे भांडार नष्ट करताना दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
 
या कारवाई दरम्यान कमांडोंनी तळावरील एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. सर्जिकल स्ट्राईकची ही कारवाई सोपी नव्हती. दहशतवाद्यांकडूनही जोरदार गोळीबार झाला. पण आपल्या एकाही कमांडोची जिवीतहानी होऊ न देता सर्व दहशतवाद्यांना संपवून ही टीम पुन्हा सुखरुप आपल्या तळावर परतली.