शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

आम्ही रिकामटेकडे आहोत का?

By admin | Updated: April 8, 2016 02:55 IST

दुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रोजगार याबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीदुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि मनरेगाच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले रोजगार याबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल) सर्वोच्च न्यायालयात  १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. यामुळे न्यायाधीशांनी त्यांना रागातच विचारले की ‘आम्ही रिकामटेकडे आहोत का? कमीत-कमी या बाबतीत तरी काही गंभीरता दाखवा.’ दुष्काळग्रस्त भागांबाबत चुकीची आकडेवारी दाखल केल्याबद्दलही न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. एन. व्ही. रमण यांच्या पीठाने गुजरात व हरियाणा या दोन राज्यांना खडसावले. केंद्र सरकारतर्फे न्यायालयात ज्यावेळी वरील मुद्द्यावर शपथपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागण्यात आला, त्यावेळी न्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘असे वाटते, ही तुमची प्राथमिकता नाही. आम्हाला काही काम नाही का? इथे दोन न्यायाधीश बसलेले आहेत. तुमची आमच्याकडून हीच अपेक्षा आहे का की, आम्ही काहीच करू नये? वेळ घालवण्यासाठी आम्ही घड्याळ बघत बसावे का?’ ज्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद न्यायालयात पोहोचल्या, त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना खडसावून सांगितले, ‘१५ मिनिटे काही बोलू नका आणि चालते व्हा. आमचा वेळसुद्धा मौल्यवान आहे.’ आम आदमी पार्टीचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्या स्वराज अभियान या बिगर सरकारी संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे. दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये केंद्र आणि त्या-त्या राज्य सरकारांनी काय उपाययोेजना केलेल्या आहेत, अशी विचारणा या याचिकेत सरकारला करण्यात आलेली आहे.