शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

EVM सुरक्षित आहेत का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि निवडणूक आयोगाला सवाल

By admin | Updated: April 13, 2017 15:33 IST

र मतदान यंत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13 - गेल्या काही काळापासून मतदार यंत्र सदोष असल्याचे, त्यात फेरफार होत असल्याचे करण्यात येत असलेले आरोप, राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्नचिन्ह, या पार्श्वभूमीवर  मतदान यंत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे. 
मतदार यंत्रात होणारा फेरफार रोखण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन जोडणे अनिवार्य करणे अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका बहुजन समाज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. चेलामेश्वर यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला 8 मे पर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. 
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर बसपाने मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर बसपाने मतदान यंत्रांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, बसपाने मतदान यंत्राविरोधात उभ्या केलेल्या न्यायालयीन लढाईला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचाही पाठिंबा मिळाला आहे. 
मतदान यंत्रांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याआधीही याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यावर सुनावणी करताना 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रे अधिकाधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी या यंत्रांना व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्याचे निर्देश दिले होते. 
व्हीव्हीपीएटी मशीन  मतदान यंत्राला जोडल्यामुळे मतदारांना आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले आहे की नाही याची खातरजमा करणे शक्य होते. दरम्यान, सध्या निवडणूक आयोगाकडून प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर सुरू आहे.