शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

EVM सुरक्षित आहेत का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि निवडणूक आयोगाला सवाल

By admin | Updated: April 13, 2017 15:33 IST

र मतदान यंत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13 - गेल्या काही काळापासून मतदार यंत्र सदोष असल्याचे, त्यात फेरफार होत असल्याचे करण्यात येत असलेले आरोप, राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्नचिन्ह, या पार्श्वभूमीवर  मतदान यंत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे. 
मतदार यंत्रात होणारा फेरफार रोखण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन जोडणे अनिवार्य करणे अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका बहुजन समाज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. चेलामेश्वर यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला 8 मे पर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. 
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर बसपाने मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर बसपाने मतदान यंत्रांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, बसपाने मतदान यंत्राविरोधात उभ्या केलेल्या न्यायालयीन लढाईला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचाही पाठिंबा मिळाला आहे. 
मतदान यंत्रांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याआधीही याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यावर सुनावणी करताना 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रे अधिकाधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी या यंत्रांना व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्याचे निर्देश दिले होते. 
व्हीव्हीपीएटी मशीन  मतदान यंत्राला जोडल्यामुळे मतदारांना आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले आहे की नाही याची खातरजमा करणे शक्य होते. दरम्यान, सध्या निवडणूक आयोगाकडून प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर सुरू आहे.