शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

बुरहानच्या वडिलांचे शांततेसाठी आवाहन

By admin | Updated: July 8, 2017 15:08 IST

आपल्याला काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण हवे असल्याचे मत बुरहानच्या वडिलांनी मांडले आहे.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 8- बुरहान वानीला भारतीय सुरक्षा दलांनी ठार मारल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुरहानचे वडील मुजफ्फर अहमद वानी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची हत्या किंवा दुर्घटना होऊ नये असे सांगत आपल्याला काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण हवे असल्याचे मत मांडले आहे.
 
बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या दिवसाला एक वर्ष पुर्ण होण्याचा हा दिवस जवळ येऊ लागला तसे फुटीरतावाद्यांचे विविध कार्यक्रम समोर येऊ लागले होते. इंग्लंडमध्येही बर्मिंगहॅम शहरात बुरहान वानीच्या नावाने मोर्चा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भारत सरकारच्या उप उच्चायुक्तांनी तक्रार करुन दहशतवाद्याला मानवी हक्काच्या नावाखाली मोठे होण्याची संधी देऊ नका असे मत तेथे मांडले. त्यानंतर या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्याचबरोबर काश्मीरमध्येही काही घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर बुरहानच्या वडिलांनी हे आज आवाहन केले आहे.
 
 त्राल खेरीज शोपियां आणि ट्रेहगाम येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य ठिकाणीही संचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. विद्यापीठांनी आज असलेल्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
 
बुरहान वानीला ठार मारल्याला झालं एक वर्ष, काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी
इस्लाम स्वीकारलेल्या हिंदूस अमेरिकेत अटक, दहशतवादाला होता पाठिंबा
 
कुरापती पाकिस्तान : गोळीबारात एक जवान शहीद, पत्नीचाही झाला मृत्यू
 सीमारेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कर जशास तसे चोख प्रत्युत्तर देत आहे.