शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

केळझर पाणीपुरवठा योजना रद्द करण्यास नगरसेवकांचा नकार सटाणा नपाच्या ठरावाविरुद्ध अपील : योजना पूर्ण करण्यासाठी साकडे

By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST

नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे.

नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन अपील दाखल केले आहे.
नगरपालिकेच्या १९ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करून त्याऐवजी नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करून त्यास मंजुरी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. त्यास विरोध करून शुक्रवारी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन नगरपालिकेच्या ठरावावर अपील दाखल केले. त्यात म्हटले आहे की, १९९८ साली युती सरकारच्या कार्यकाळात केळझर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरांतर्गत वितरण व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे पूर्ण झालेली आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झालेला असून, लवकरच सटाणा शहरापर्यंत पाणी पोहोचेल, अशी परिस्थिती आहे. धरणालगत असलेल्या काही गावांनी या योजनेस विरोध केला असता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील पोलीस बंदोबस्तात योजनेची कामे करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्याने सटाणा नगरपालिकेला पत्र देऊन केळझर पाणीपुरवठा योजनेऐवजी कळवण तालुक्यातील नवीन पूनद प्रकल्प येथून पाणीपुरवठा योजना तयार करावी, असे सुचविले. मुळात नवीन पूनद प्रकल्पातून नवीन योजना करण्यासाठी धरणाच्या पाण्यावर आरक्षण टाकण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर नवीन योजनेसाठी लागणारा खर्च कोण करेल, त्याचबरोबर केळझर योजनेसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच दृष्टीपथात असलेले पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्यासाठी करण्यात आलेला ठराव रद्द करण्यात येऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणीही या अपिलात करण्यात आली आहे. या अपिलावर बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे, नलिनी सोनवणे, मनोज सोनवणे, सुशीला रौंदळ, सिंधूबाई सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, सुमनबाई सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, अनिल कुवर, अश्पाक शेख, रमणलाल छाजेड आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.