शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अनुपम खेर यांना पद्मभूषण कशासाठी?

By admin | Updated: January 31, 2016 03:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्याखेरीज अनुपम खेर यांनी अशी काय कामगिरी करून दाखवली की त्यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली, असा सवाल अभिनेते आणि कथा, पटकथा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्याखेरीज अनुपम खेर यांनी अशी काय कामगिरी करून दाखवली की त्यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली, असा सवाल अभिनेते आणि कथा, पटकथा लेखक कादर खान यांनी केल्यामुळे एक नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीतील तारे-तारकांची नावे पाहून, मला हा पुरस्कार मिळाला नाही, हे चांगलेच झाले, असेही कादर खान यांनी बोलून दाखवले आहे. दिल्लीतील नेत्यांच्या आगेमागे करणाऱ्या अनेकांनाच हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. मी आजतागायत कोणाची हांजी हांजी केली नाही आणि यापुढेही करणार नाही, असे नमूद करून, अशा व्यक्तींना हे पुरस्कार मिळत असतील, तर ते मला नको, असे त्यांनी म्हटले आहे. पद्मश्रीसाठी माझी निवड झाली नाही, हे चांगलेच झाले, अशी टिप्पणी करून ते म्हणाले की, सुरुवातीला या पुरस्कारामध्ये प्रामाणिकपणा असायचा. पण तो आता राहिलेला नाही. आता लोक स्वार्थी झाले आहेत. पुरस्कार देण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत मला काही म्हणायचे नाही. पण माझ्यात अशी काय त्रुटी होती की माझी पुरस्कारासाठी निवड झाली नाही, हे मात्र मला समजून घ्यायचे आहे, असेही कादर खान यांचे म्हणणे आहे.हिंदू म्हणवून घ्यायलाही घाबरतो - खेरकादर खान यांच्या या प्रतिक्रियेवर अनुपम खेर काहीही बोललेले नाहीत. मात्र, मी हिंदू आहे, असे सांगायलाही मी घाबरतो. मी हिंदू आहे, असे बोलून दाखवले आणि कपाळावर टिळा लावला तर माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस म्हणून शिक्का मारला जाईल, असे अनुपम खेर यांनी बोलून दाखवले. दादरीची घटना दुर्दैवी होती, यात वादच नाही. पण मालदा येथील घटनेचे काय, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचे काय, असे सवाल अनुपम खेर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केले.