शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा

By admin | Updated: July 16, 2016 02:50 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना संसदीय कामकाज समितीतून वगळून पुन्हा धक्का दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना संसदीय कामकाज समितीतून वगळून पुन्हा धक्का दिला आहे. त्यासोबतच विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचा पंतप्रधानांनी महत्त्वाच्या आर्थिक व्यवहार समितीतही समावेश केला आहे. याआधी राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अन्य दिग्गजांचा समावेश असलेल्या या महत्त्वाच्या समितीत स्मृती इराणी यांचा समावेश करण्यात आला. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा आणि या समितीतील समावेशाचा काहीही संबंध नव्हता. विविध मुद्द्यांवर तडाखेबाज उत्तर देण्यासाठी पक्षानेही त्यांना अनेकदा पुढे केले होते.परंतु काळ बदलला आणि त्यांचे भवितव्यही बदलल्याचे दिसते. ५ जुलैच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल करताना स्मृती इराणी यांच्याकडील वजनदार मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत जबर धक्का देण्यात आला. आता पुन्हा धक्का देत पंतप्रधानांनी त्यांना संसदीय कामकाज समितीमधून वगळले आहे. सुषमा स्वराज या राजकीय व्यवहार आणि सुरक्षा या समितीच्या सदस्य असतानाही त्यांचा आर्थिक व्यवहार समितीत समावेश करण्यात आला आहे. हा फेरबदल पाहता सुषमा स्वराज पुन्हा सक्रिय राजकारणात दमदारपणे उतरल्या आहेत, असे दिसते.आर्थिक व्यवहार समिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही समितीच सर्व आर्थिकविषयक निर्णय घेते, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या समितीचे निर्णय येत नाहीत. गृहमंत्री राजनाथसिंह हे या समितीचे प्रमुख असून, जितेंद्र सिंग यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी निवास व्यवस्था करण्याकामी थेट भूमिका निभवावी, अशी पंतप्रधानांची इच्छा दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आणि ईशान्य विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले डॉ. जितेंद्र सिंग यांचा मंत्रिमंडळाच्या निवास व्यवस्था समितीवर विशेष निमंत्रक म्हणून समावेश करण्यात आला आहे. स्मृती इराणी यांना पुन्हा दुसरा धक्का देत पंतप्रधानांनी त्यांना संसदीय कामकाज समितीमधून वगळले आहे.