शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
5
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
6
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
7
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
8
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
9
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
10
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
11
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
13
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
14
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
15
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
16
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
17
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
18
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
19
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
20
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त

मंदसौरमध्ये आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: June 10, 2017 00:26 IST

पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली.

मंदसौर : पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली. पोलिसांच्या मारहाणीतच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव कायम असून, तेथील इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. तेथील संचारबंदी सकाळी १0 ते संध्याकाळी ६ या वेळेत शिथिल करण्यात आली होती. मात्र रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या तिथे तैनात आहेत.घन:श्याम धाकड (२६) हे रात्रीच्या वेळी मंदिरात जात असताना पोलिसांनी या शेतकऱ्याला अडवून त्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर या शेतकऱ्याला इंदोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. या शेतकऱ्याचेतीन सहकारी दिनेश मालवी, शिवनारायण मालवी आणि गणेश मालवी हे बेपत्ता असल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी खासदार सज्जन सिंह वर्मा यांनी केला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि शवविच्छेदनाचा व्हिडिओ तयार करावा, अशी मागणीही वर्मा यांनी केली आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत १५६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले की, अनेक एटीएम सुरु झाले असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. या आंदोलनात जळालेली दुकाने आणि वाहने यांचा अहवाल तयार करण्यात येत असून संबंधितांना ही मदत चेकने देण्यात येईल. शेतकरी आंदोलन आता छिंदवाडा जिल्ह्यातही पोहचले आहे. मंदसौरच्या पिपलीमंडीत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तथापि, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. मतभेद दूर करण्यासाठी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे यात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)