शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मंदसौरमध्ये आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: June 10, 2017 00:26 IST

पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली.

मंदसौर : पोलीस गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली. पोलिसांच्या मारहाणीतच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव कायम असून, तेथील इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. तेथील संचारबंदी सकाळी १0 ते संध्याकाळी ६ या वेळेत शिथिल करण्यात आली होती. मात्र रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या तिथे तैनात आहेत.घन:श्याम धाकड (२६) हे रात्रीच्या वेळी मंदिरात जात असताना पोलिसांनी या शेतकऱ्याला अडवून त्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर या शेतकऱ्याला इंदोरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. या शेतकऱ्याचेतीन सहकारी दिनेश मालवी, शिवनारायण मालवी आणि गणेश मालवी हे बेपत्ता असल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी खासदार सज्जन सिंह वर्मा यांनी केला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि शवविच्छेदनाचा व्हिडिओ तयार करावा, अशी मागणीही वर्मा यांनी केली आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत १५६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी श्रीवास्तव यांनी सांगितले की, अनेक एटीएम सुरु झाले असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. या आंदोलनात जळालेली दुकाने आणि वाहने यांचा अहवाल तयार करण्यात येत असून संबंधितांना ही मदत चेकने देण्यात येईल. शेतकरी आंदोलन आता छिंदवाडा जिल्ह्यातही पोहचले आहे. मंदसौरच्या पिपलीमंडीत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तथापि, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. मतभेद दूर करण्यासाठी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे यात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)