शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यात आणखी ५ स्मार्ट सिटी

By admin | Updated: September 21, 2016 06:21 IST

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या पाच शहरांचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटीजच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या पाच शहरांचा समावेश केला आहे. एकट्या महाराष्ट्रातीलच पाच राज्ये या यादीत असून, त्यामुळे राज्यातील एकूण सात शहरे स्मार्ट होणार आहेत. पुणे आणि सोलापूरचा याआधीच समावेश झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. तिथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असून, पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी या शहराबरोबरच आग्रा, अजमेर, कानपूर हीही आता स्मार्ट सिटी योजनेत आली आहेत.मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व उज्जैन ही शहरेही आता स्मार्ट होणार आहेत, तर सिक्कीममधील नामची शहर स्मार्ट होण्यासाठी निवडले गेले आहे. ओडिशातील राउरकेला व राजस्थानातील कोटा तसेच नागालँडमधील कोहिमा ही शहरेही निवडली गेली आहेत. जम्मू-काश्मीर, प. बंगाल, केरळ, बिहार, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम या राज्यांतील एकाही शहराचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीत समावेश नाही.>गुजरातमधील १ तर पंजाबमधील २ शहरे

गुजरात आणि पंजाबमध्येही पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, पंजाबमधील अमृतसर, जालंधर ही दोन शहरे तर गुजरातमधील एकमेव बडोदा स्मार्ट सिटीजच्या तिसऱ्या यादीत आले आहे. मात्र कर्नाटकातील हुबळी-धारवाड, मंगलोर, टुमकुर, शिमोगा ही शहरेही तिसऱ्या यादीमध्ये आली आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि वेल्लोर तर तामिळनाडूतील सेलम, तंजावूर, मदुराई ही शहरेही आता स्मार्ट सिटीज बनणार आहेत. >66,883 कोटी रुपयांची गुंतवणूक २७ शहरांना स्मार्ट करण्यासाठी करावी लागणार आहे. ही स्मार्ट सिटीजची तिसरी यादी असून, ती घोषित करताना नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, या यादीमुळे शहरांची संख्या ६0 झाली आहे. 60शहरांना स्मार्ट करण्यासाठी १ लाख ४४ हजार ७४२ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. स्मार्ट सिटीसाठी शहर निवडण्याची जी स्पर्धा होते, त्यात कल्याण-डोंबिवली दुसऱ्या क्रमांकावर असून, नागपूर पाचव्या, ठाणे आठव्या, नाशिक दहाव्या आणि औरंगाबाद २५व्या क्रमांकावर आले. स्मार्टच्या पहिल्या यादीत राज्यातील पुणे व सोलापूरचा समावेश होता.

>स्मार्ट सिटी मुद्दे>नाशिकचा आराखडा २१९४ कोटींचाजुन्या नाशिकच्या पुनर्विकासासाठी ३५९.६९ कोटी, ग्रीनफिल्ड अंतर्गत हनुमानवाडी क्षेत्र विकासासाठी ८५५.८९ कोटी रुपये, तर पॅनसिटी अंतर्गत पाणीपुरवठ्यात स्मार्ट मीटर व स्काडा सिस्टीम आणि वाहनतळ व वाहतूक व्यवस्थेसाठी ९७९.०४ कोटी रुपये. क्रिसिल या नामवंत संस्थेने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीचा आराखडा तयार केला. स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने सांस्कृतिक वारशांचे जतन व विकास करणे, वाइन कॅपिटल म्हणून पर्यटकांना आकर्षित करणे आणि शहराला कॉम्पॅक्ट सिटी म्हणून विकसित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. काही प्रकल्प हे पीपीपी आणि कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमांतूनही राबविण्याचे प्रस्तावित आहे.>नागपूरचा ३९ हजार कोटींचा प्रस्ताव पर्यावरणास अनुकूल असा विकासउच्च दर्जाचे शिक्षणइलेक्ट्रॉनिक सिटीनद्या सुधारणाट्रान्ससिट ओरिएन्टल डेव्हलपमेंट सुरक्षित शहर>कल्याण-डोंबिवलीचा आराखडा - २०३२ कोटींचापालिका क्षेत्रातील स्टेशन परिसरांचा विकासवाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणाघनकचरा विल्हेवाट प्रकल्पांची उभारणीसर्व सुविधा आयटीशी जोडणे>औरंगाबादचा आराखडा - १७३० कोटींचासार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रोजगाराला प्राधान्यपर्यटनाला वाव, पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारमहापालिका सभागृह सुरू असतानाच स्मार्ट सिटी समावेशाची बातमी आली. त्यामुळे जल्लोष, अभिनंदनाचा ठराव>ठाण्याचा आराखडा - ६५०० कोटींचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधामनोरूग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानकाची उभारणीमुंबईची मेट्रो ठाण्यात. पुढे डोंबिवली, कल्याण, भिवंडीपर्यंतघनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाट प्रकल्पांची उभारणी >सोलापूरचा आराखडा - २२४७ कोटींचा१०० कचरा व्यवस्थापनसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भरसौरऊर्जा प्रकल्प, रस्ते- उड्डाण पूलजल पूनर्वापर प्रकल्प>पुण्याचा आराखडा ३ हजार कोटींचासार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान करणे, संपूर्ण शहराला २४ तास पाणी पुरविणे, मल्टीलेवल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र आदींचे नियोजन पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीअंतर्गत १४ प्रमुख प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.शहराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासठी ३५५ ते ३७५ कोटी रूपयांची तरतुद केली आहे, एसटीपी केंद्रातून ऊर्जा निर्मितीसाठी १० कोटी व त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६५ कोटी अशी ४५० कोटी रूपयांचा खर्च प्रस्तावितबस थांब्याची सुधारणा, बसची देखभाल, बसमधील आयटीएमएस यंत्रणा याकरिता १६० कोटी रूपयांची तरतूद