शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

आणखी ४0 स्मार्ट सिटिज २३ जूनला

By admin | Updated: June 15, 2017 00:59 IST

स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट शहरांची संख्या १00 वर पोहोचणार आहे. नगर विकास मंत्रालयाने २३ जूनला सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एका विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, त्यावेळी त्यांची नावे जाहीर करण्यात येतील.या कार्यशाळेत शहरांच्या लाईव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्ससह नगरविकास मंत्रालयाच्या आजवरच्या खास उपक्रमांची माहिती सादर केली जाईल, ही माहिती नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी पत्रकारांना दिली. भारतात ज्या शहरांमध्ये नगरपालिका आहेत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी के्रडिट रेटिंग मिळवले तर कर्ज मिळवण्यासाठी त्यांना दहा ठिकाणी हिंडावे लागणार नाही, असे स्पष्ट करून नायडू म्हणाले की, देशात स्मार्ट सिटीज व अमृत योजनेतील ३२२ शहरांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्रेडिट रेटिंग आजवर मिळवले आहे. हा एक चांगला पायंडा आहे. देशातील सर्वच शहरांच्या नगरपालिका लवकरच क्रेडिट रेटिंग मिळवतील, अशी आशा आहे. प्रत्येक शहराचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, ही संकल्पना नवी नाही, हे मान्य करीत नायडू म्हणाले की, आजवर विविध प्रकल्पांसाठी कर्ज, अनुदान, अर्थसाह्य इत्यादी स्वरूपात मदत मागण्यासाठी राज्य सरकारांचे प्रतिनिधी केंद्राकडे यायचे. राज्यांच्या प्रकल्पांसाठी केंद्राच्या विविध मंजुऱ्या मिळवाव्या लागत. त्यासाठीही राज्याचे प्रतिनिधी वारंवार दिल्लीला चकरा मारायचे. मोदी सरकारने हा पॅटर्न पूर्णत: बदलून टाकला. आता केंद्र सरकारचे अधिकारी राज्यांत जातात. प्रकल्प व योजनांची समिक्षा करतात आणि गरज भासल्यास त्यात आवश्यक ते बदल स्ुचवून या प्रकल्पांना अथवा योजनांना त्या राज्यातच मंजुरी दिली जाते. गेल्या तीन वर्षांत २२ राज्यांमध्ये प्रकल्प मंजुरी बैठका झाल्या आहेत. पहिल्या दिवशी केंद्राचे अधिकारी प्रकल्प वा योजनेची चिकि त्सा करतात आणि दुसऱ्या दिवशी सुचवलेल्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री मंजुरी देतात. या प्रयोगामुळे देशात अनेक विकास प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळाली आहे, असा दावाही नायडू यांनी केला.४ लाख कोटींच्या गुंतवणुकीला मान्यताभारतात २0५0 पर्यंत शहरांची लोकसंख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक होणार आहे. देशापुढील हे मोठे आव्हान आहे, हे लक्षात घेऊ न मोदी सरकारने नगरविकासाशी संबंधित विविध योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने आतापर्यंत नगरविकास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.