शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ४0 स्मार्ट सिटिज २३ जूनला

By admin | Updated: June 15, 2017 00:59 IST

स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेत आजवर देशातील ६0 शहरे निवडण्यात आली असून, येत्या २३ जून रोजी आणखी ४0 नव्या शहरांची त्यासाठी निवड होईल. त्यामुळे निवडलेल्या स्मार्ट शहरांची संख्या १00 वर पोहोचणार आहे. नगर विकास मंत्रालयाने २३ जूनला सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एका विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, त्यावेळी त्यांची नावे जाहीर करण्यात येतील.या कार्यशाळेत शहरांच्या लाईव्ह अ‍ॅबिलिटी इंडेक्ससह नगरविकास मंत्रालयाच्या आजवरच्या खास उपक्रमांची माहिती सादर केली जाईल, ही माहिती नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी पत्रकारांना दिली. भारतात ज्या शहरांमध्ये नगरपालिका आहेत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांनी के्रडिट रेटिंग मिळवले तर कर्ज मिळवण्यासाठी त्यांना दहा ठिकाणी हिंडावे लागणार नाही, असे स्पष्ट करून नायडू म्हणाले की, देशात स्मार्ट सिटीज व अमृत योजनेतील ३२२ शहरांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे क्रेडिट रेटिंग आजवर मिळवले आहे. हा एक चांगला पायंडा आहे. देशातील सर्वच शहरांच्या नगरपालिका लवकरच क्रेडिट रेटिंग मिळवतील, अशी आशा आहे. प्रत्येक शहराचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे, ही संकल्पना नवी नाही, हे मान्य करीत नायडू म्हणाले की, आजवर विविध प्रकल्पांसाठी कर्ज, अनुदान, अर्थसाह्य इत्यादी स्वरूपात मदत मागण्यासाठी राज्य सरकारांचे प्रतिनिधी केंद्राकडे यायचे. राज्यांच्या प्रकल्पांसाठी केंद्राच्या विविध मंजुऱ्या मिळवाव्या लागत. त्यासाठीही राज्याचे प्रतिनिधी वारंवार दिल्लीला चकरा मारायचे. मोदी सरकारने हा पॅटर्न पूर्णत: बदलून टाकला. आता केंद्र सरकारचे अधिकारी राज्यांत जातात. प्रकल्प व योजनांची समिक्षा करतात आणि गरज भासल्यास त्यात आवश्यक ते बदल स्ुचवून या प्रकल्पांना अथवा योजनांना त्या राज्यातच मंजुरी दिली जाते. गेल्या तीन वर्षांत २२ राज्यांमध्ये प्रकल्प मंजुरी बैठका झाल्या आहेत. पहिल्या दिवशी केंद्राचे अधिकारी प्रकल्प वा योजनेची चिकि त्सा करतात आणि दुसऱ्या दिवशी सुचवलेल्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री मंजुरी देतात. या प्रयोगामुळे देशात अनेक विकास प्रकल्पांच्या कामकाजाला गती मिळाली आहे, असा दावाही नायडू यांनी केला.४ लाख कोटींच्या गुंतवणुकीला मान्यताभारतात २0५0 पर्यंत शहरांची लोकसंख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक होणार आहे. देशापुढील हे मोठे आव्हान आहे, हे लक्षात घेऊ न मोदी सरकारने नगरविकासाशी संबंधित विविध योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने आतापर्यंत नगरविकास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.