शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

सीमा सुरक्षेसाठी आणखी ११ हजार महिला

By admin | Updated: May 18, 2015 02:44 IST

सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा

नवी दिल्ली : सीमेवरील तैनाती, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठीच्या बंदोबस्तासाठी केंद्रीय सुरक्षा दलात ११ हजारांपेक्षा अधिक महिलांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या हेतूने लवकरच ही भरती केली जाणार आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. यावर्षी कॉन्स्टेबल रूपात ६२ हजारांपेक्षा अधिक युवा पुरुष व महिलांची भरती करण्याची घोषणा सरकारने अलीकडेच केली होती. यापाठोपाठ केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि भारतीय तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी)सारख्या निमलष्करी दलांमध्येही ८५३३ महिला कॉन्स्टेबल भरती करण्याचीही सरकारची योजना आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सशस्त्र सीमा दलात २१ नव्या तुकड्या (कंपन्या) उभारण्यास आणि एकूण २७७२ महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.येत्या काळात केंद्रीय दलांत महिलांचे प्रतिनिधित्व पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी महिलांची भरती केली जात आहे. सद्य:स्थितीत या दलांमध्ये महिलांची संख्या एकूण संख्येच्या केवळ २.१५ टक्के आहे. सीआरपीएफमध्ये दोन महिला बटालियन वाढविण्यास गृहमंत्रालयाने विशेष मंजुरी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)