शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा!

By admin | Updated: June 1, 2017 03:06 IST

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा

जयपूर: भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा गाईचे आणि गोवंशाचे रक्षण करण्यासाठी गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, अशी सूचना राजस्थान उच्च न्यायालयाने बुधवारी केली.गोहत्येसाठी असलेली शिक्षा वाढवून ती जन्मठेप अशी केली जावी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. न्या. महेश चंद्र शर्मा यांनी बुधवारी सेवानिवृत्त होण्याआधी दिलेल्या १४५ पानी हिंदी निकालपत्रात ही मते व्यक्त केली. सुमारे आठ हजार भेकड आणि बेवारस गायींचा सांभाळ करणाऱ्या जयपूरमधील हिंगोलिया पांजरापोळमध्ये गेल्या वर्षी शंभरहून अधिक गायी मरण पावल्या होत्या. त्यासंबंधीत जनहित याचिकेवर न्या. शर्मा यांनी हे निकालपत्र दिले.शेजारचे नेपाळ हिंदूराष्ट्र आहे व तेथे गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे, असा संदर्भ देत न्या. शर्मा यांनी म्हटले की, भारतातही गोवंशाचे रक्षण करणे हे राज्यघटेननुसार सरकारचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४८ नुसार गोवंशासह अन्य दुधाळ आणि शेतीयोग्य जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करून त्यांचे वाण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. गायीला ‘न्यायिक व्यक्तित्व’ बहाल करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. या अनुषंगाने त्यांनी राजस्थानचे मुख्य सचिव आणि अ‍ॅडव्होकेट जनरल यांची गाईंचे ‘कायदेशीर संरक्षक’ म्हणून नेमणूक केली व दोघांनी गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा, असेहि निर्देश दिले. (वृत्तसंस्था)न्या. शर्मा यांनी नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना या निकालपत्राचे विश्लेषण व समर्थन केले. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या प्रजननाविषयी धादान्त अवैज्ञानिक सिद्धांत पत्रकारांना सांगितला. न्या. शर्मा म्हणाले: जो मोर है, यह आजीवन ब्रह्मचारी है. वह मोरनी के साथ सेक्स नही करता. उसके जो आंसू आते हे, मोरनी उन्हे चुभकर गर्भवती होती है और मोर या मोरनी को जन्म देती है!