शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:53 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.

- विकास खाडे/विनोद गोळे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊ न अण्णा रामलीला मैदानावर आले. राजस्थानी शेतकºयांनी सादर केलेल्या क्रांतिगीतानंतर अण्णांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणा-या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.अण्णा म्हणाले की, शेतक-यांना उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत मी ४३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, प्रश्न सुटत नाही. मी उपोषण करू नये, म्हणून मंत्री मला तीन-चार वेळा भेटून गेले. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनीही दिले. मात्र, शेतकरी प्रतिनिधींशी मी यावर चर्चा करेन, तुम्हीही त्यांच्यासमोर येऊन बोला, असे कृषिमंत्र्यांना सांगितले आहे. याबाबतचा निर्णय होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.कोणी मुख्यमंत्री तर कोणी मंत्री झालेत२0१२ मधील आंदोलनाच्या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे हरयाणातील निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल अण्णांसोबत होते. आजही ते होते. त्यांचा उल्लेख करून अण्णा म्हणाले की, त्या आंदोलनाची टीम फुटली. कोणी मुख्यमंत्री, कोणी मंत्री झाले. सच्चे आंदोलक मात्र, आजही आमच्यासोबत आहेत. या आंदोलनातून कोणीही केजरीवाल, मंत्री, पक्ष तयार होणार नसून, शेतकºयांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती आहे, असे अण्णांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशभरातून मिळतोय पाठिंबाअण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले. महाष्ट्रातही मोदी सरकारचा निषेध करत, अण्णासमर्थक काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसले.अण्णांना अश्रू अनावरभगतसिंग, सुखदेव, राजगुरूया क्रांतिकारकांनी आजच्या दिनी स्वत:ची आहुती दिली. देशात लोकशाही नांदावी, असे या क्रांतिकारकांचे स्वप्न होते, पण कोठे आहे स्वातंत्र्य व लोकशाही? गांधीजींचे स्मरण करून हजारे म्हणाले की, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी स्वत:चा बळी द्यावा लागला, तरीचालेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अण्णा हजारे महाराष्ट्र सदनमधून थेट राजघाटावर गेले. तेथे महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाचे अण्णांनी दर्शन घेतले. या वेळी अण्णांना अश्रू अनावर झाले.सरकारने बसेस, रेल्वे रोखल्याया आंदोलनासाठी येणा-यांच्या बसगाड्या सरकाररोखत आहे. रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. याला लोकशाही म्हणायचे का? तरीही लोक दिल्लीकडे येत आहेत. मी अधूनमधून बोलत राहीन. बोलण्यामुळे ऊर्जा कमी होत असली, तरी मला पर्वा नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे