शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

अण्णा पुन्हा रामलीलावर, दिल्लीत बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:53 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.

- विकास खाडे/विनोद गोळे

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून ‘करेंगे या मरेंंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला. वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने मरण्यापेक्षा समाजासाठी उपोषण करून मरावे, अशा शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त करताच, देशभरातून आलेल्या आंदोलकांनी टाळ्यांच्या गजराने त्यांना पाठिंबा दिला.राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊ न अण्णा रामलीला मैदानावर आले. राजस्थानी शेतकºयांनी सादर केलेल्या क्रांतिगीतानंतर अण्णांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणा-या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.अण्णा म्हणाले की, शेतक-यांना उत्पादन खर्चाप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांबाबत मी ४३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, प्रश्न सुटत नाही. मी उपोषण करू नये, म्हणून मंत्री मला तीन-चार वेळा भेटून गेले. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनीही दिले. मात्र, शेतकरी प्रतिनिधींशी मी यावर चर्चा करेन, तुम्हीही त्यांच्यासमोर येऊन बोला, असे कृषिमंत्र्यांना सांगितले आहे. याबाबतचा निर्णय होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील.कोणी मुख्यमंत्री तर कोणी मंत्री झालेत२0१२ मधील आंदोलनाच्या वेळी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे हरयाणातील निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल अण्णांसोबत होते. आजही ते होते. त्यांचा उल्लेख करून अण्णा म्हणाले की, त्या आंदोलनाची टीम फुटली. कोणी मुख्यमंत्री, कोणी मंत्री झाले. सच्चे आंदोलक मात्र, आजही आमच्यासोबत आहेत. या आंदोलनातून कोणीही केजरीवाल, मंत्री, पक्ष तयार होणार नसून, शेतकºयांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती आहे, असे अण्णांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशभरातून मिळतोय पाठिंबाअण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले. महाष्ट्रातही मोदी सरकारचा निषेध करत, अण्णासमर्थक काही काळ रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसले.अण्णांना अश्रू अनावरभगतसिंग, सुखदेव, राजगुरूया क्रांतिकारकांनी आजच्या दिनी स्वत:ची आहुती दिली. देशात लोकशाही नांदावी, असे या क्रांतिकारकांचे स्वप्न होते, पण कोठे आहे स्वातंत्र्य व लोकशाही? गांधीजींचे स्मरण करून हजारे म्हणाले की, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. त्यासाठी स्वत:चा बळी द्यावा लागला, तरीचालेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता अण्णा हजारे महाराष्ट्र सदनमधून थेट राजघाटावर गेले. तेथे महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाचे अण्णांनी दर्शन घेतले. या वेळी अण्णांना अश्रू अनावर झाले.सरकारने बसेस, रेल्वे रोखल्याया आंदोलनासाठी येणा-यांच्या बसगाड्या सरकाररोखत आहे. रेल्वेगाड्या रद्द करीत आहे. याला लोकशाही म्हणायचे का? तरीही लोक दिल्लीकडे येत आहेत. मी अधूनमधून बोलत राहीन. बोलण्यामुळे ऊर्जा कमी होत असली, तरी मला पर्वा नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे