शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:41 IST

वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत

गुंटूर : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत. हा निर्णय वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी जाहीर केला. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ९ सदस्य आहेत.ते म्हणाले की, मोदी सरकार सापत्न वागणूक देत आहे. आम्ही लोकसभेत आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने अविश्वासाचा ठरावही मांडला. पण तोही चर्चेला येऊ नये, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. संसदेचे अधिवेशन एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. त्याच्या दुसºया दिवशी आमचे लोकसभा सदस्य आपले राजीनामे अध्यक्षांकडे सादर करतील.वायएसआर काँग्रेसवर भाजपाशी गुप्त मैत्रीचा होत असलेला आरोप पूर्णत: खोटा आहे, असे ते एका प्रश्नावर उत्तरले. आमचा भाजपाशी छुपा वा उघड कोणताही समझोता नाही, मैत्री नाही आणि त्यामुळे पुढील वर्षी राज्यात होणाºया विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, डावे पक्ष वा इतरांनी आमच्याशी आघाडी करण्याची तयारी दर्शवल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.तेलगू देसमला आवाहनतेलगू देसम व आमच्या पक्षाची आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबतची मागणी समान आहे. त्यामुळे तेलगू देसमच्या लोकसभा सदस्यांनीही राजीनामे द्यावेत, तशा सूचना चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना द्याव्यात, असे आवाहनही रेड्डी यांनी केले. अर्थात तेलगू देसमने या आवाहनाला उत्तर दिलेले नाही. मात्र केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी तेलगू देसमही टोकाची भूमिका घेऊ शकते.