शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:41 IST

वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत

गुंटूर : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत. हा निर्णय वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी जाहीर केला. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ९ सदस्य आहेत.ते म्हणाले की, मोदी सरकार सापत्न वागणूक देत आहे. आम्ही लोकसभेत आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने अविश्वासाचा ठरावही मांडला. पण तोही चर्चेला येऊ नये, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. संसदेचे अधिवेशन एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. त्याच्या दुसºया दिवशी आमचे लोकसभा सदस्य आपले राजीनामे अध्यक्षांकडे सादर करतील.वायएसआर काँग्रेसवर भाजपाशी गुप्त मैत्रीचा होत असलेला आरोप पूर्णत: खोटा आहे, असे ते एका प्रश्नावर उत्तरले. आमचा भाजपाशी छुपा वा उघड कोणताही समझोता नाही, मैत्री नाही आणि त्यामुळे पुढील वर्षी राज्यात होणाºया विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, डावे पक्ष वा इतरांनी आमच्याशी आघाडी करण्याची तयारी दर्शवल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.तेलगू देसमला आवाहनतेलगू देसम व आमच्या पक्षाची आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबतची मागणी समान आहे. त्यामुळे तेलगू देसमच्या लोकसभा सदस्यांनीही राजीनामे द्यावेत, तशा सूचना चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना द्याव्यात, असे आवाहनही रेड्डी यांनी केले. अर्थात तेलगू देसमने या आवाहनाला उत्तर दिलेले नाही. मात्र केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी तेलगू देसमही टोकाची भूमिका घेऊ शकते.