शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोदी सरकारवर नाराज; वायएसआरचे सर्व खासदार देणार राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:41 IST

वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत

गुंटूर : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसचे सर्व खासदार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामे देणार आहेत. हा निर्णय वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी जाहीर केला. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ९ सदस्य आहेत.ते म्हणाले की, मोदी सरकार सापत्न वागणूक देत आहे. आम्ही लोकसभेत आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने अविश्वासाचा ठरावही मांडला. पण तोही चर्चेला येऊ नये, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. संसदेचे अधिवेशन एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. त्याच्या दुसºया दिवशी आमचे लोकसभा सदस्य आपले राजीनामे अध्यक्षांकडे सादर करतील.वायएसआर काँग्रेसवर भाजपाशी गुप्त मैत्रीचा होत असलेला आरोप पूर्णत: खोटा आहे, असे ते एका प्रश्नावर उत्तरले. आमचा भाजपाशी छुपा वा उघड कोणताही समझोता नाही, मैत्री नाही आणि त्यामुळे पुढील वर्षी राज्यात होणाºया विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, डावे पक्ष वा इतरांनी आमच्याशी आघाडी करण्याची तयारी दर्शवल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.तेलगू देसमला आवाहनतेलगू देसम व आमच्या पक्षाची आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबतची मागणी समान आहे. त्यामुळे तेलगू देसमच्या लोकसभा सदस्यांनीही राजीनामे द्यावेत, तशा सूचना चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना द्याव्यात, असे आवाहनही रेड्डी यांनी केले. अर्थात तेलगू देसमने या आवाहनाला उत्तर दिलेले नाही. मात्र केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी तेलगू देसमही टोकाची भूमिका घेऊ शकते.