शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाण्यासाठी आयुक्तांच्या घरावर मोर्चा संत नामदेवनगरातील नागरिकांचा संताप : नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याच्या मागणीसाठी घातला गोंधळ

By admin | Updated: April 24, 2016 19:00 IST

जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.

जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.

पाच वर्षांपासून पाठपुरावा
इंद्रप्रस्थनगर भागातील संत नामदेवनगर परिसरात पूर्वी घरे कमी असल्याने मनपाने अडीच इंची पाईपलाईन टाकली होती. तेव्हा तेथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र नंतर विस्तार झाल्याने घरे वाढली. नळकनेक्शनही वाढले. त्यातच जास्त पाणी मिळावे म्हणून नागरिकांकडून पाणी आल्यावर नळाला मोटारी लावणे सुरू झाले. त्यामुळे शेवटच्या भागात पाणी पोहोचत नसल्याने त्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांनी गेल्या ५ वर्षांपासून मनपा पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही.

घरासमोर घातला गोंधळ
रविवारी सकाळी या भागात पाणीपुरवठा होणार होता. मात्र पाणीच मिळत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट शिवाजीनगरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानकडे मोर्चा वळविला. तेथे सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वारावर अडविल्यावर नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अखेर आयुक्तांनी बाहेर येऊन नागरिकांशी चर्चा केली.
-------
काम मार्गी लावण्याचे आश्वासन
मनपा आयुक्त संजय कापडणीस हे मोर्चेकर्‍यांना सामोरे गेले. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना याबाबत विचारणा केली. मात्र खडके बाहेरगावी असल्याने त्यांनी शाखा अभियंता सुनील तायडे यांना तेथे पाठविले. त्यांनी त्याभागातील वस्ती वाढल्याने पाईपलाईनची क्षमता कमी पडत असल्याचे व नवीन पाईपलाईन आमदार निधीतून प्रस्तावित करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी नागरिकांना आपण स्वत: या विषयात लक्ष घालू असे आश्वासन दिले.