शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

सरकारविरुद्ध संताप

By admin | Updated: December 10, 2014 01:40 IST

महाराष्ट्रातील दुष्काळ व शेतक:यांच्या आत्महत्यांबाबत लोकसभेत मंगळवारी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. राज्यातील खासदार लोकसभेत प्रश्न विचारत आहेत,

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील दुष्काळ व शेतक:यांच्या आत्महत्यांबाबत लोकसभेत मंगळवारी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. राज्यातील खासदार लोकसभेत प्रश्न विचारत आहेत, पण त्यावर सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. शून्य प्रहरातही हा विषय आला पण आर्थिक मदत न करता केवळ कागदी घोडे नाचवत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला. 
कृपाल तुमाने, नाना पटोले, हिना गावित, सुनील गायकवाड, रवीद्र गायकवाड, प्रतापराव जाधव, काँग्रेसचे अशोक चव्हाण, राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक यांनी यावर मंत्र्यांनी उत्तर द्यावे असा आग्रह मंगळवारी धरला. सायंकाळी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी उत्तर देण्यास प्रारंभ केला, तेव्हा ते 2क्क्8 पासूनच्या शेतक:यांच्या आत्महत्यांची संख्या सांगत होते. तेव्हा अशोक चव्हाण यांनी संख्या आम्हाला माहीत आहे, सरकार शेतक:यांच्या कुटुंबाला कशी मदत करणार आहे, ते सांगा असे म्हटले. त्यावर सिंह यांनी आघाडीच्या काळात आत्महत्या केलेल्या शेतक:यांची संख्या आतापेक्षा अधिक होती, असे सांगून त्या वर्षांतील शेतक:यांच्या एकूण आत्महत्या व शेतीच्या कारणाने झालेल्या आत्महत्यांचे वर्गीकरण केले. तेम्हणाले,2क्क्8 एकूण 38क्2 एकूण आत्महत्यांपैकी 1क्94 शेतीच्या कारणांनी झाल्या. 2क्13 मधील 3145 पैकी 4क्3 शेतीच्या कारणांनी,2क्13 मध्ये 3686 पैकी 1क्42 शेतीच्या कारणांनी झाल्या. यंदा आतार्पयत 422 आत्महत्या झाल्या आहेत. मृत्यूची कारणो कोणतीही असली तरी सरकारला चिंता असून, मजबुतीने या संकटाचा आपण सामना करू, असे त्यांनी म्हणताच, सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपाय सरकारने शोधले पाहिजेत. महाराष्ट्राला मदतीचे पॅकेज कधी, किती देणार ते सांगा. आत्महत्यांची ही आकडेवारी सांगणो म्हणजे शेतक:यांची चेष्टा आहे, असे त्यांनी म्हणताच, कृषिमंत्री सिंह म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत संख्या सांगितली जात होती. आपण गंभीर असून, पूर्ण दिवसभर यावर चर्चा करू. 
सरकारने राज्यात आढावा घेण्यासाठी एक पथक पाठविले आहे. त्यांचा अहवाल 15 तारखेला येईल, त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होईल असे ते म्हणाले. मात्र त्यांच्या या उत्तरानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. अशोक चव्हाण म्हणाले, दुष्काळाचा विषय अत्यंत गंभीर आहे, मदतीचे पॅकेज जाहीर न करता कागदी घोडे नाचवणो सुरू आहे.  बँकांच्या कर्जाने, बँकेच्या तगाद्याने त्याचे मन खच्ची होत आहे. रोज 2क् पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारने मृतांची संख्या सांगून आपले तुपले करू नये. तेव्हा,‘ ठोस आश्वासन देत नाही, ते सरकार शेतक:यांनी काय न्याय देणार.’ अशा घोषणा देत सर्व सदस्यांनी सभात्याग केला. सदस्य बाहेर पडत असताना, सांसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी,दुष्काळाचा विषय अत्यंत गंभीर असून विरोधकांचेही मत जाणून घेतले जाईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाठविलेला अहवाल सविस्तर आहे, त्यावर सरकार विचार करत असून, केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करून मदतीचा निर्णय घेऊ असे म्हटले, पण तोवर सदस्यांनी सभागृह सोडले होते. 
 
केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राबाबत कमालीची अनास्था आहे. ठोस आश्वासन नाही, निर्णय नाही, मदतीसाठी शब्दही नाही. उलट शेतक:यांची चेष्टा सुरू आहे.
- अशोक चव्हाण,  काँग्रेस खासदार
राज्याचा आढावा घेण्यासाठी पाठवलेल्या पथकांचा अहवाल आल्यावर सरकार मदत करेल, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्र राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावील  शेतक:यांना कजर्माफी द्या, असे मागणी आपण केली आहे.
- नाना पटोले, भाजपा खासदार
 
दूध, साखर, कापसाचे भाव पडले आहेत. कर्जामुळे शेतकरी कंगाल झाला आहे. त्यांना मदत कधी हा आमचा प्रश्न आहे. राज्याने 3924 कोटींच्या पॅकेजची मागमी केली आहे. त्यावर सरकार बोलत नाही. 
- सुप्रिया सुळे, 
राष्ट्रवादी खासदार
शेतक:यांना झळ बसत आहे, हे मान्य असून, जोवर तांत्रिक बाबी पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही थांबू. विरोधकांचा बहिष्कार अयोग्य आहे.
- अरविंद सावंत,
प्रवक्ते, शिवसेना