शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात राजधानीची ४ शहरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:10 IST

विकासाचे विकेंद्रीकरण; राजधानी अमरावती स्थान गमावणार

तिरुपती : आंध्र प्रदेशला बहुधा चार राजधानींची शहरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे या चार शहरांची नावे जाहीर करणार हे रविवारी उघड झाल्यावर सध्या राज्याची राजधानी अमरावती हलवली जाणार या चर्चेला सुरुवातझाली.

सत्ताधारी वाय. एस. आर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (तेदेप) यांच्यात नव्या राजधानीच्या बांधकामावरून संघर्ष सुरू असताना भाजपचे खासदार टी. जी. वंकटेश म्हणाले की, रेड्डी यांनी अमरावती शहर राज्याच्या राजधानीचा मान गमावणार असल्याचे आधीच केंद्र सरकारला कळवले आहे. गोदावरी नदीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळवण्यास मान्यता दिल्याबद्दल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर वेंकटेश यांनी टीका केली. ते म्हणाले, जे लोक राव यांच्या योजनेसोबत असतील ते उद्ध्वस्त होतील. (वृत्तसंस्था)विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापारेड्डी हे विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापा या शहरांत राजधानी स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचे वेंकटेश म्हणाले. ते रविवारी कुर्नूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.अमरावती हा विकासासाठी फ्री झोन बनवावा, सत्तेचे विकेंद्रीकरण करावे, उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना इतर भागांतही करावी, असे आवाहन आम्ही याआधीच जगन रेड्डी यांना केले होते, असे सांगून चार शहरांत राजधानीच्या विचारांचे लोक स्वागत करतील, असे ते म्हणाले.