शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी

By admin | Updated: April 28, 2017 21:01 IST

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ऑनलाइन लोकमत
अनंतपूरम, दि. 28 - आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर, या दुर्घटनेतील चार जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूरम जिल्ह्यातील गुंटाकाल ब्लॉक येथील एरटिम्मा राजू तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप चार जण बेपत्ता असल्याचे समजते. दरम्यान, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच, बेपत्ता असलेल्यांची आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अद्याप मिळालेली नाहीत.
डेक्कन हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या गावातील मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. यावेळी 20 लोक या बोटीत प्रवास करत होते. त्यातील 13 जण हे एकाच कुटुंबातील होते. 
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून संबंधित जिल्हातील अधिका-यांना बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.  
सविस्तर वृत्त लवकरच...