शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...आणि भारताला मिळाली व्हाइसरॉयची बग्गी!

By admin | Updated: January 25, 2017 17:04 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेली व्हाइसरॉयची बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रपतींची आलिशान बग्गी तुम्ही पाहिली असेलच. एकेकाळी ब्रिटिशांचे भारतातील व्हाइसरॉयच्या दिमतीला असणारी ही बग्गी सध्या भारताचे राष्ट्रपती अनेक महत्त्वाच्या कार्यक्रामांना उपस्थित राहण्यासाठी जाताना वापरतात. अशी ही ऐतिहासिक वारसा लाभलेली बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे.  
  1947 साली भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यावर ही बग्गी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला. दोन्ही देशांनी या बग्गीवर आपला अधिकार सांगितला होता. स्वातंत्र्यानंतर देशातील संपत्तीची भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटणी झाली. त्यावेळी दोन्ही देश या बग्गीसाठी अडून बसले. कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर बग्गीच्या मालकीसाठी नाणेफेक करण्याचा निर्णय झाला. 
या निर्णयानुसार ब्रिटिश व्हाइसरॉयच्या अंगरक्षकांच्या तुकडीतील  तत्काली कमांडेट आणि डेप्युटी कमांडेट यांच्यात नाणेफेक करण्यात आली. त्यापैकी मुस्लिम असलेल्या डेप्युटी कमांडेंटनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. अखेर नाणेफेक झाली आणि त्याचा कौल भारताच्या कमांडेंटच्या बाजूने लागला. त्याबरोबरच व्हाइसरॉयची बग्गीही भारताला मिळाली.