शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पनीरसेल्वम गटात आनंद, शशिकला समर्थक दु:खात

By admin | Updated: February 15, 2017 00:19 IST

सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्याविरुद्ध निकाल लागल्याने पनीरसेल्वम गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी चेन्नई व राज्यभर फटाके उडवून जल्लोष

नवी दिल्ली/चेन्नई : सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्याविरुद्ध निकाल लागल्याने पनीरसेल्वम गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी चेन्नई व राज्यभर फटाके उडवून जल्लोष केला, तर शशिकला गटात मात्र दु:खाचे वातावरण होते. पोएस गार्डन या निवासस्थानी शशिकला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांचे चेहरे उतरल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र,अण्णा द्रमुकने शशिकला यांचे समर्थनच केले. जेव्हा केव्हा जयललिता यांच्यावर भार पडला, तेव्हा तेव्हा शशिकला यांनी तो आपल्या खांद्यावर घेतला. आताही त्या तीच जबाबदारी पार पाडत आहेत, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयानंतरच शशिकला यांच्या उपस्थितीत पलानीस्वामी यांनी अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. जयललिता यांचे भाचे दीपक जयकुमार यांनाही त्यावेळी आणण्यात आले होते. जयललिता कुटुंबियांचा पलानीस्वामी यांच्या निवडीस पाठिंबा आहे, असे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी मात्र, या निर्णयाचे ऐतिहासिक या शब्दांत वर्णन करतानाच, राज्यात स्थिर सरकारसाठी राज्यपालांनी पावले उचलावीत, असे आवाहन केले. ते म्हणाले की, जवळपास दोन दशकांनंतर न्याय झाला. सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्यांनी कसे वागावे हेच दाखवणारा हा निर्णय आहे. कोणीही कायद्यापासून पळून जाऊ शकत नाही हे हा निवाडा सांगतो. सार्वजनिक जीवनात सचोटी व चारित्र्य खूपच महत्वाचे आहे. सगळ््या राजकीय नेत्यांसाठी हा धडा असेल. स्वामींकडून स्वागतवीस वर्षांपासून बघितलेली या निर्णयाची वाट फलदायी ठरली अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. स्वामी यांनी जनता पक्षाचे अध्यक्ष असताना जयललिता यांच्याविरुद्ध १९९६ मध्ये पहिली तक्रार केली होती. ते म्हणाले आम्ही २० वर्षे लढत होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)