शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

पनीरसेल्वम गटात आनंद, शशिकला समर्थक दु:खात

By admin | Updated: February 15, 2017 00:19 IST

सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्याविरुद्ध निकाल लागल्याने पनीरसेल्वम गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी चेन्नई व राज्यभर फटाके उडवून जल्लोष

नवी दिल्ली/चेन्नई : सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्याविरुद्ध निकाल लागल्याने पनीरसेल्वम गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी चेन्नई व राज्यभर फटाके उडवून जल्लोष केला, तर शशिकला गटात मात्र दु:खाचे वातावरण होते. पोएस गार्डन या निवासस्थानी शशिकला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांचे चेहरे उतरल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र,अण्णा द्रमुकने शशिकला यांचे समर्थनच केले. जेव्हा केव्हा जयललिता यांच्यावर भार पडला, तेव्हा तेव्हा शशिकला यांनी तो आपल्या खांद्यावर घेतला. आताही त्या तीच जबाबदारी पार पाडत आहेत, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयानंतरच शशिकला यांच्या उपस्थितीत पलानीस्वामी यांनी अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. जयललिता यांचे भाचे दीपक जयकुमार यांनाही त्यावेळी आणण्यात आले होते. जयललिता कुटुंबियांचा पलानीस्वामी यांच्या निवडीस पाठिंबा आहे, असे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी मात्र, या निर्णयाचे ऐतिहासिक या शब्दांत वर्णन करतानाच, राज्यात स्थिर सरकारसाठी राज्यपालांनी पावले उचलावीत, असे आवाहन केले. ते म्हणाले की, जवळपास दोन दशकांनंतर न्याय झाला. सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्यांनी कसे वागावे हेच दाखवणारा हा निर्णय आहे. कोणीही कायद्यापासून पळून जाऊ शकत नाही हे हा निवाडा सांगतो. सार्वजनिक जीवनात सचोटी व चारित्र्य खूपच महत्वाचे आहे. सगळ््या राजकीय नेत्यांसाठी हा धडा असेल. स्वामींकडून स्वागतवीस वर्षांपासून बघितलेली या निर्णयाची वाट फलदायी ठरली अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. स्वामी यांनी जनता पक्षाचे अध्यक्ष असताना जयललिता यांच्याविरुद्ध १९९६ मध्ये पहिली तक्रार केली होती. ते म्हणाले आम्ही २० वर्षे लढत होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)