शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

अमिताभ, प्रियंका ‘अतुल्य भारत’चे नवे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर

By admin | Updated: January 22, 2016 02:41 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा अतुल्य भारत मोहिमेचे नवे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर असतील. यासंदर्भातील अधिकृत घोषणा २६ जानेवारीनंतर केली जाईल.

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा अतुल्य भारत मोहिमेचे नवे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर असतील. यासंदर्भातील अधिकृत घोषणा २६ जानेवारीनंतर केली जाईल.केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी प्रथमच सरकारकडून ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडरची थेट नियुक्ती करण्यात येत आहे. यापूर्वी ‘अतिथी देवो भव’या मोहिमेसाठी आम्ही मॅक्केन वर्ल्डवाईड या संस्थेसोबत करार केला होता,अशी माहिती पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिली होती. बीग बी आणि प्रियंका यांची तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी त्यांना कुठलेही शुल्क दिले जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल्य भारतच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडरसाठी पर्यटन मंत्रालयाची पहिली पसंती अमिताभ बच्चन यांना होती. बच्चन कुठल्याही वादात गुंतले नसून ते गुजरातचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर राहून चुकले आहेत,असे मंत्रालयाचे मत होते. हिंदी चित्रसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान गेल्या १० वर्षांपासून ‘अतुल्य भारत’ चा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर होता. परंतु त्याचा करार संपला असल्याची माहिती पर्यटन मंत्रालयातर्फे अलीकडेच देण्यात आली. दरम्यान सरकारने कराराचे कारण पुढे केले असले तरी आमिरने देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळेच त्याला हटविण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)